शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सत्संग हा सुखी जीवनाचा मार्ग- भगवान महाराज आनंदगडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:36 IST

सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संसार मुळीच दु:खदायी नाही. मात्र आपल्या कमार्नं त्याला दु:खी बनवलं असून यातून मुक्ती हवी असेल सत्संगाशिवाय पर्याय नाही. कारण सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथील माऊलीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील काल्याच्या कीर्तनात निरुपण करताना हभप आनंदगडकर महाराज बोलत होते.संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाचीया पोरे । आधी चोरी केली खरे ।। या अभंगावर आनंद गडकर महाराजांनी सुंदर असे विवेचन केले. पुढे ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र खरे तर इतके खडतर होते की आपण त्याची कल्पनाही करु शकत नाहीत. मात्र आजकाल आपणासारखे तर इतके दु:ख सहनही करु शकत नाही. संत संगत ही नेहमीच चांगला रस्ता दाखवणारी आहे. म्हणूनच आपणही याच मार्गाचा स्वीकार केला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, नंदाच्या मुलांनी चोरी केली म्हणून आपणही चोरी करावी, हे बरोबर नाही. ती संत महंत मंडळी होती, महान होती. त्यांनी खोडकरपणा म्हणून अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या मात्र आपण असला प्रकार करता कामा नये, त्यात यश नव्हे तर अपयशच येते, असेही शेवटी भगवान महाराजांनी सांगितले. गेले सप्ताहाभर दररोज काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दररोज सायंकाळी हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी हभप सोपान महाराज डोंगरे, ह. भ. प. नाना महाराज पोखरीकर, सावळेश्वर भजनी मंडळ आदींसह माऊलीनगर वासियांसह गावक-यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक