शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

वाढीव मदत मिळाल्यासच समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:34 IST

तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : कापसाच्या काड्या झाल्या, सोयाबीन गेले, मका गेला, हातात काहीच आलं नाही. शासनाने तोकडी मदत दिली. साहेब अडचणींचा डोंगर आहे. तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.तालुक्यातील कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी विविध पिकांची पाहणी केली व शेतक-यांसमवेत संवाद साधला़ यावेळी या पथकाने गट नं २० मधील रामेश्वर बळीराम लहाने यांच्या शेतात मका पिकाची पाहणी केली. मक्याला अतिवृष्टीमुळे कोंब फुटले, पीक सडले. पिकासाठी एक लाखाचे पीककर्ज काढून खर्च केल्याचे संबंधित शेतक-याने सांगितले. येथील गट नं. १९ मधील धोंडीबा पांडुरंग जाधव यांच्या शेतातील कापूस, बाजरी या पिकांची पाहणी केली़ यावेळी या अतिवृष्टीमुळे कापसाच्या कवड्या झाल्या असून, या कापसाची वेचणीही करता येत नाही. बाजरीसुध्दा खराब झाल्याने हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी सांगितले़ यावेळी संगीता रमेश कान्हेरे या शेतकरी महिलेने अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाल्याचे सांगत शासनाने दिलेली ८ हजार रूपये हेक्टर म्हणजे सुमारे ३ हजार रू प्रती एकर ही मदत कमी आहे. यात आम्ही केलेला खर्चही निघत नाही. आमचे कर्जही तसेच असून, आम्हाला भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित अनेकांनी शेतक-यांच्या विविध समस्या यावेळी मांडल्या.या पथकात डॉ व्ही. थिरूपाज, डॉ. के. मनोहरण यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी