शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

‘सरजमीन’ ने जागले देशभक्तीचे स्फुल्लिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:28 IST

येथील रोटरी परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सरजमीन’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जालना : येथील रोटरी परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सरजमीन’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील दहा हजारांवर नागरिकांनी हजेरी लावून देशभक्तीची भावना जागृती केली.आठवडाभरापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीचा प्रत्यक्ष अनुभव जालनेकरांनी प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी घेतला. दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेली भव्य बैठक व्यवस्था, अचूक नियोजन, अत्याधुनिक साऊंड व्यवस्था, भव्य स्टेज, लाईट्स आणि कोलकाता येथील समन्वय समवेत गु्रपच्या ८० सदस्यांनी देशभक्तीपर गीतांवर एक तास ५० मिनिटे सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. रोटरीच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमाचा उद्देश व संकल्पना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सृष्टी निर्मितीवर आधारित ‘ओम’ उच्चारणाचे गीत सादर करण्यात आले. १८५७ चा झालेला उठाव, ब्रिटीश साम्राज्याचा उदय यात मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई यांनी दिलेला लढा, स्वदेशी आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या ऐतिहासिक घटनांवर आधारित गीते आणि त्यावर सादर करण्यात आलेले प्रासंगिक नृत्याने वातावरण अधिकच भारावून गेले. दे दी हमे आझादी, बिना खडक, बिना ढाल, अब तुम्हारे हवाले वतन साथियो , ये मेरे वतन के लोगो आदी या गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. ‘संदेसे आते है, हमे तडपाते है’ या गीताने सीमेवर देशासाठी लढणा-या जवानांची कुटुंबियांप्रती असलेले प्रेम भावना दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समन्वय समवेत गु्रपचे प्रमुख कमल गांधी यांनी ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश, त्यातून शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी केलेली मदत याबाबत माहिती दिली.------------मान्यवरांची उपस्थितीकार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्यासह औरंगाबाद लष्करी छावणीचे मुख्य अधिकारी कमांडर डी.के. बत्रा, रामेश्वर शर्मा, पी. व्यंकटेश, एस.के.घोष, लाँगनाथम, विविध विभागांचे अधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, उद्योजक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.-----------नियोजनाची प्रशंसाकार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता आयोजकांच्या वतीने अगदी पार्किंग व्यवस्थेपासून चोख नियोजन केले होते. आसनावर प्रत्येकासाठी एक तिरंगा झेंडा, अल्पोपाहार, पाणी कचरा गोळा करण्यासाठी स्वयंसेवक, महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह याची उत्तम व्यवस्था कार्यक्रमस्थळी होती.