शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘सरजमीन’ ने जागले देशभक्तीचे स्फुल्लिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:28 IST

येथील रोटरी परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सरजमीन’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जालना : येथील रोटरी परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सरजमीन’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील दहा हजारांवर नागरिकांनी हजेरी लावून देशभक्तीची भावना जागृती केली.आठवडाभरापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीचा प्रत्यक्ष अनुभव जालनेकरांनी प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी घेतला. दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेली भव्य बैठक व्यवस्था, अचूक नियोजन, अत्याधुनिक साऊंड व्यवस्था, भव्य स्टेज, लाईट्स आणि कोलकाता येथील समन्वय समवेत गु्रपच्या ८० सदस्यांनी देशभक्तीपर गीतांवर एक तास ५० मिनिटे सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. रोटरीच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमाचा उद्देश व संकल्पना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सृष्टी निर्मितीवर आधारित ‘ओम’ उच्चारणाचे गीत सादर करण्यात आले. १८५७ चा झालेला उठाव, ब्रिटीश साम्राज्याचा उदय यात मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई यांनी दिलेला लढा, स्वदेशी आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या ऐतिहासिक घटनांवर आधारित गीते आणि त्यावर सादर करण्यात आलेले प्रासंगिक नृत्याने वातावरण अधिकच भारावून गेले. दे दी हमे आझादी, बिना खडक, बिना ढाल, अब तुम्हारे हवाले वतन साथियो , ये मेरे वतन के लोगो आदी या गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. ‘संदेसे आते है, हमे तडपाते है’ या गीताने सीमेवर देशासाठी लढणा-या जवानांची कुटुंबियांप्रती असलेले प्रेम भावना दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समन्वय समवेत गु्रपचे प्रमुख कमल गांधी यांनी ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश, त्यातून शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी केलेली मदत याबाबत माहिती दिली.------------मान्यवरांची उपस्थितीकार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्यासह औरंगाबाद लष्करी छावणीचे मुख्य अधिकारी कमांडर डी.के. बत्रा, रामेश्वर शर्मा, पी. व्यंकटेश, एस.के.घोष, लाँगनाथम, विविध विभागांचे अधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, उद्योजक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.-----------नियोजनाची प्रशंसाकार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता आयोजकांच्या वतीने अगदी पार्किंग व्यवस्थेपासून चोख नियोजन केले होते. आसनावर प्रत्येकासाठी एक तिरंगा झेंडा, अल्पोपाहार, पाणी कचरा गोळा करण्यासाठी स्वयंसेवक, महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह याची उत्तम व्यवस्था कार्यक्रमस्थळी होती.