रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांची गैरसोय
जालना : शहरातील अंबड चौफुली ते शनी मंदिरकडे येणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर सतत धूळ उडत असून, ही धूळ येथील दुकानांमध्ये जात आहे. शिवाय याचा नाहक त्रास या भागातील व्यापारी, नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहन चालकांमधून केली जात आहे.
बालकवयित्री बरकुले हिचा सत्कार
परतूर : नामवंत कवींच्या कविता सादर करणारी बालकवयित्री श्रावणी बरकुले हिचा न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूलच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश सोळंके, छाया बागल, लेखक छबुराव भांडवलकर, कल्याण बागल, हरी कवडे, सुनील कासट, स्मिता रोडगे, साम वर्घीस, गोविंद पाठक, गोविंद डहाळे, लिनामोल साम, सुरेखा ताजी, दामिनी टाकणखार, गजानन जाधव आदींची उपस्थिती होती.