शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

समर्थ रामदास स्वामींचे 'देव' अद्याप सापडेनात; ग्रामस्थांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन

By दिपक ढोले  | Updated: August 24, 2022 14:15 IST

श्रीराम मंदिरातून श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमानाच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील सहा मूर्ती सोमवारी चोरीला गेल्या होत्या. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आली. दरम्यान, मूर्तीचा शोध तत्काळ घेण्यात यावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी मंदिर परिसरात आज सकाळपासून एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. 

तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या श्रीराम मंदिरातून श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमानाच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान, मंगळवारी मूर्तीविनाच मंगळवारी आरती झाल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली. गावात दिवसभर शांतता दिसून आली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, आज ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. 

मंदिर दर्शनासाठी खुलेचोरी गेलेल्या मूर्तींचा अद्यापही शोध लागला नाही. सोमवारी रात्री समर्थ रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज भूषण स्वामी ठोसर यांनी मंदिरात श्रीरामांची प्रतिमा ठेवून मंदिर दर्शनासाठी खुले केले आहे.

सहा पथके मागावर : चार जणांची चौकशीमूर्तींची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास एक कार गावाच्या परिसरात फिरत होती. त्याची चौकशी केली असता, त्यात उस्मानाबाद येथील काही लोक असल्याचे पोलिसांना समजले. त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी