शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जालना जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, पेरुला विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:14 IST

वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. प्रधानमंत्री फळपीक योजनेअंतर्गत या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हवामानातील बदलांमुळे अनेकदा फळपिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनामध्ये घट येते. अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे शेतक-यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक कारणांमुळे फळबागेचे नुकसान झाल्यास शेतक-यांना भरपाई मिळावी राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक योजना राबविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात सध्या मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरू या फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. त्यानुसार मोसंबी पिकांसाठी १४ जूनपर्यंत, डाळिंबासाठी १४ जुलै तर पेरुसाठी चार जुलैपर्यंत विमा काढता येणार आहे. पेरुसाठी तीर्थपुरी, मंठा, तळणी, पिंपळगाव रेणुकाई या चार महसूल मंडळांचा समावेश आहे.मृग बहरातील मोसंबीसाठी जालना तालुक्यातील जालना शहर, ग्रामीण, रामनगर, नेर, विरेगाव, पाचनवडगाव, वाघ्रूळ, सेवली, भोकरदन तालुक्यातील भोकरदन, सिपोरा, राजूर, केदारखेडा, जाफराबादमधील जाफराबाद, माहोरा, कुंभारझरी, टेंभूर्णी, वरुड बु., अंबडमधील अंबड, धनगरपिंप्री, जामखेड, रोहिलागड, वडीगोद्री सुखापुरी, गोंदी, घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव, कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी, आंतरवाली टेंभी, जांबसमर्थ रांजणी, परतूरमधील परतूर, वाटूर, सातोना, श्रीष्टी, आष्टी, मंठा, पांगरी गोसावी, तळणी, ढोकसाळ या महसूल मंडळातील शेतक-यांनी विमा काढता येणार आहे.

टॅग्स :fruitsफळेgovernment schemeसरकारी योजना