शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

रोहयो; आठवडाभरात दोन हजार मजुरांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:58 IST

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही वाढत आहे. शेतीत आता कामे उरली नसल्याने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर केवळ चार हजार मजुर होते, ती संख्या आता थेट सहा हजारांवर गेली आहे.

ठळक मुद्देजालना : स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही वाढत आहे. शेतीत आता कामे उरली नसल्याने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर केवळ चार हजार मजुर होते, ती संख्या आता थेट सहा हजारांवर गेली आहे.जालना जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेची कामे ही १७२ ग्रामपंचायतमध्ये सुरू असून, त्या कामावर सहा हजार २०० एवढी आहे. या कामांमध्ये कृषी, वनविभाग तसेच रेशीम लागवडीचा समावेश आहे. या कामवरील मजुरांना २०३ रूपये दररोज हे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. दरम्यान, आतापर्यंत कुशल आणि अकुशल मजुरांवर एकूण ३२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती रोजगार हमी विभागाकडून देण्यात आली. जालना जिल्ह्यातून जालना शहर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईला कामाच्या शोधात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु बाहेरच्या शहरात जात असताना बहुतांश कुटुंब हे ग्रामपंचायतीला कल्पना न देताच स्थलांतर करत असल्याने प्रशासनाकडे नेमके किती कुंटुंब बाहेरगावी गेले आहेत, याचा तपशील मिळण्यास अडचणी येत आहेत.गावपातळीवर कामे नसल्याने जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत मिळेल ते काम करण्यासाठी ग्रामीण भागातील बेरोजगार युवक एकवेळचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था असल्यास केवळ १०० रूपये रोज या दरात काम करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. आयटीआयमध्ये तर बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत.तालुकानिहाय कामे आणि मजुरांची संख्याअंबड ६४ (५९१), बदनापूर ९३ (६३६), भोकरदन १७ (२०१), घनसावंगी १८६ (१६६९), जाफराबाद २६ (१४१), मंठा २८ (२२८), जालना २७ (५६४), परतूर २६० (२१९२) असे एकूण ७०३ ग्रामपंचायतींमध्ये ६ हजार २२ मजुरांची संख्या रोजगार हमी योजनेच्या कामावर आहे. कंसाबाहेरील आकडे हे त्या त्या तालुक्यातील ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या कामांची असून कंसातील आकडे मजुरांची संख्या दर्शवितात.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र