शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरातील रस्ते आता एलईडीच्या दिव्यांनी उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:49 IST

उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला योजना )ही योजना केंद्र आणि राज्य शासन ाच्या ऊर्जा विभागाकडून राबविण्यात येत असून, ही योजना एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस अंतर्गत ३० एप्रिल २०१६ पासून लागू केलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला योजना )ही योजना केंद्र आणि राज्य शासन ाच्या ऊर्जा विभागाकडून राबविण्यात येत असून, ही योजना एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस अंतर्गत ३० एप्रिल २०१६ पासून लागू केलेली आहे.मात्र या योजनेची प्रगती व प्रसिद्धी कमी असल्यामुळे या योजने अंतर्गत विजेची बचत होण्याच्या दृष्टीने जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात एलईडी लाईट बसविण्या संदर्भात पालकमंत्री लोणीकर यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, महावितरण चे अधीक्षक अभियंता कैलास हुमणे , कार्यकारी अभियंता देवकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कार्यकारी अभियंता अजय सिंग, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार सुमन मोरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकणी यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती होती. जालना , परतूर , भोकरदन ,अंबड नगर परिषद कार्यालय , मंठा ,जाफराबाद, बदनापूर ,घनसावंगी नगर पंचायत कार्यालय तसेच जिल्ह्यातील इतर सर्व सर्व शासकीय कार्यालयात प्राधान्याने एलईडी दिवे बसविण्याच्या सूचना लोणीकर यांनी नोडल अधिकारी कैलास चव्हाण यांना दिले .जालना शहरासंदर्भात माहिती देताना नोडल अधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, पूर्वी नोडल एजन्सीने जालना नगर परिषदेसासेबत २०१६ मध्ये करारनामा करून, उजाला योजने अंतर्गत शहरातील सर्व पथदिवे बदलून एलइडी लाईट बसविण्यास सुरवात करून २०० एलईडी बसविण्यात आले होते . मात्र २०१६ ला महावितरणचे नगर परिषदकडे ११ कोटी रूपयांची विद्युत बिल थकले होते. त्या मुळे शहरातील पथदिव्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यामुळे शहरात पथदिव्यास विद्युत कनेक्शन नसल्यामुळे उर्वरित एलईडी बसविण्याची प्रक्रिया बंद केली होती.मात्र, जालना नगर परिषद , शहरातील नागरिकांनी पथदिवे सुरु करण्या संदर्भात अनेक निवेदने दिली होती. त्या नुसार पालकमंत्री लोणीकर यांनी हे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी ,नगर परिषद जालना , महावितरण जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात जालना नगर परिषदेकडे असलेल्या वीज बिलासंदर्भात संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. संयुक्त सर्वेक्षणा नुसार सुधारीत देयक भरण्याचे ठरले होते. त्या पैकी सुधारित बिलातील (११ कोटी ऐवजी ८ कोटी ५२ लक्ष) मूळ मुद्दल भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत ४ कोटी १२ लक्ष इतका निधीही उपलब्ध करून महावितरणकडे २७ मार्चला भरणा करण्यात आला होता. त्यानुसार जालना शहरात जवळपास सहा हजार एलईडी पथदिवे बसण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती संबंधित एजंसीने दिली.जालना शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजवुरवठा अचानक ंखंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याचे कारणही या बैठकीत चर्चेला आले. त्यावैही काही ठिकाणी वीजेचे साहित्य नसल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत. असे सांगण्यात आले. त्यावेळी अधीक्षक अभियंता यांनी खुलासा करतांना सांगितले की, सध्या साहित्य तसेच डीपी आॅईलची कमतरता होती. ती आता दूर करण्यात आली आहे. उरण येथून १० केएल. एवढे आॅईल आणले असून, त्यातून डीपी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा गौण राणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांचे वीजबिल थकले असल्याचे हुमणे म्हणाले.

टॅग्स :electricityवीजgovernment schemeसरकारी योजनाcivic issueनागरी समस्या