शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
5
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
6
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
7
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
8
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
9
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
10
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
11
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
12
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
13
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
14
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
15
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
16
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
17
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
18
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
19
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
20
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज

रस्ता, पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:00 AM

वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / मौजपुरी : वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीच्या उत्सवातच मतदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.जालना तालुक्यातील मौजपुरी येथील करुणा मोरे यांनी महिलांच्या वतीने प्रसिध्दीपत्रक काढले आहे. गावात लाखो रूपये खर्च करून विकास कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आजही ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. गावातील धार्मिक स्थळावर डोकं टेकविण्यासाठी हजारो भाविक येतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.गावातील मूलभूत प्रश्न सोडविणे, जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे इ. विविध प्रश्न मांडले असून, हे प्रश्न वर्षानुवर्षापासून कायम आहेत. हे प्रश्न कोणत्याच राजकीय नेत्याने सोडविलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचेही मोरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. जालना- राजूर मार्गाचे काम झाले. मात्र, नाल्यांचे काम न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार घडत असून, शाळकरी मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.मागासवर्गीय वस्तीत थंडी, ताप, मलेरिया, खोकला, डेंग्यू इ. आजार उद्भवले आहेत. या भागात गत दोन वर्षापासून नाल्यांच्या साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर रतनराज डोळसे, पूनम डोळसे, रोहिणी लोखंडे, गजानन अंकुशकर, यम्मन कातुरे, यशोदा माने, सुनील डोळसे, मिलिंद दाभाडे, संजय डोळसे, छगनराव वाघमारे, सिध्दार्थ पवार, रोहन डोळसे, सिध्दार्थ डोळसे यांच्यासह गावातील जवळपास ६२ ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.टंचाई : विहिरीतून आणावे लागते पाणीमान देऊळगाव येथे बारमाही पाणीटंचाई आहे. महिलांना विहिरीतून शेंदून पाणी आणावे लागते. यापूर्वी एका महिलेचा पाणी आणताना जीव गेला आहे. बाणेपांगरी आरोग्य उपकेंद्रात महिलांची गैरसोय होत आहे, यासह इतर अनेक समस्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.आंदोलनाचा इशारादेऊळगाव येथील ग्रामस्थांनी मुलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय १८ आॅक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनjalna-acजालनाcivic issueनागरी समस्या