शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

एसआयटीप्रमुख कृष्णकुमारांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:31 IST

स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना ही बियाणांची राजधानी असली तरी येथे यापूर्वी अनेक बोगस बियाणे प्रकरण पुढे आली आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात येथे एका बनावट बियाणे तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश कृषी विभाग (तांत्रिक) आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.काही महिन्यापूर्वी जालन्यातील कारवाईत संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता, या सर्व बोगस बियाणांचे धागेदोरे हे गुजरातपर्यंत पोहचले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी ही राज्य सरकारने एसआयटीकडे सोपवली होती. त्या एसआयटीचे प्रमुख पोलीसमहानिरीक्षक कृष्णकुमार यांनी आढावा घेतला.कृष्णकुमार यांनी दुपारी दोन ते अडीच तास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, कृषी अधीक्षक विजय माईनकर यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी शेळके, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कृष्णकुमार यांनी सांगितले की, बंदी असेले एचटीबीटी बियाणे अर्थात हर्बीसाईड टॉलरंटवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देऊन त्याचे उत्पादन आणि विक्रीवरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश कृष्णकुमार यांनी दिले. त्यांच्या या अचानक दौ-याने बियाणे क्षेत्रात खळबळ उडाली होती.गेल्यावर्षी एप्रिलमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात बंदी असलेले आणि कुठल्याच कंपनीचे अधिकृत नसलेले एचएसबीटी बियाणांची जवळपास ६५७ पाकिटे तसेच अन्य बियाणे जप्त केले होते. दरम्यान गौर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, समाधान पवार यांनी स्वागत केले.तणनाशकाचाही परिणाम नाहीहे भारतात बंदी असलेले एचएसबीटी बियाणावर तणनाशकाचाही परिणाम होत नसल्याचे पुढे आले आहे. अत्यंत घातक असलेल्या या बियाणाने जमीनीचा पोत खराब होण्यासह पर्यावरणावरही विपरित परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भविष्यातील परिणांचा विचार करता यावर भारतात बंदी घातली आहे. या कपाशीचे उत्पादन एका अमेरिकन कंपनीने केले होते.्रयोगशाळेचा सकारात्मक अहवालहे बियाणे नागपूर आणि पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असता, तेथून ते बोगस असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर जवळपास पाचही संशयित आरोपीविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांच्या विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती कृष्णकुमार यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी या माहितीवर समाधान व्यक्त करून कृषी तसेच पोलीसांनी बंदी घातलेल्या घातक बियाणांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या संदर्भात सूचना केल्या.

टॅग्स :fraudधोकेबाजीAgriculture Sectorशेती क्षेत्र