शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एसआयटीप्रमुख कृष्णकुमारांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:31 IST

स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना ही बियाणांची राजधानी असली तरी येथे यापूर्वी अनेक बोगस बियाणे प्रकरण पुढे आली आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात येथे एका बनावट बियाणे तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश कृषी विभाग (तांत्रिक) आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.काही महिन्यापूर्वी जालन्यातील कारवाईत संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता, या सर्व बोगस बियाणांचे धागेदोरे हे गुजरातपर्यंत पोहचले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी ही राज्य सरकारने एसआयटीकडे सोपवली होती. त्या एसआयटीचे प्रमुख पोलीसमहानिरीक्षक कृष्णकुमार यांनी आढावा घेतला.कृष्णकुमार यांनी दुपारी दोन ते अडीच तास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, कृषी अधीक्षक विजय माईनकर यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी शेळके, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कृष्णकुमार यांनी सांगितले की, बंदी असेले एचटीबीटी बियाणे अर्थात हर्बीसाईड टॉलरंटवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देऊन त्याचे उत्पादन आणि विक्रीवरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश कृष्णकुमार यांनी दिले. त्यांच्या या अचानक दौ-याने बियाणे क्षेत्रात खळबळ उडाली होती.गेल्यावर्षी एप्रिलमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात बंदी असलेले आणि कुठल्याच कंपनीचे अधिकृत नसलेले एचएसबीटी बियाणांची जवळपास ६५७ पाकिटे तसेच अन्य बियाणे जप्त केले होते. दरम्यान गौर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, समाधान पवार यांनी स्वागत केले.तणनाशकाचाही परिणाम नाहीहे भारतात बंदी असलेले एचएसबीटी बियाणावर तणनाशकाचाही परिणाम होत नसल्याचे पुढे आले आहे. अत्यंत घातक असलेल्या या बियाणाने जमीनीचा पोत खराब होण्यासह पर्यावरणावरही विपरित परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भविष्यातील परिणांचा विचार करता यावर भारतात बंदी घातली आहे. या कपाशीचे उत्पादन एका अमेरिकन कंपनीने केले होते.्रयोगशाळेचा सकारात्मक अहवालहे बियाणे नागपूर आणि पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असता, तेथून ते बोगस असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर जवळपास पाचही संशयित आरोपीविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांच्या विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती कृष्णकुमार यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी या माहितीवर समाधान व्यक्त करून कृषी तसेच पोलीसांनी बंदी घातलेल्या घातक बियाणांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या संदर्भात सूचना केल्या.

टॅग्स :fraudधोकेबाजीAgriculture Sectorशेती क्षेत्र