शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

परतीच्या पावसाचा प्रचाराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:51 IST

: परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे सकाळपासूनच उमेदवारांना घराबाहेर पडतांना अडचणी आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे सकाळपासूनच उमेदवारांना घराबाहेर पडतांना अडचणी आल्या. तसेच दिवसभर रिमझिम तर कधी धुवाधार पाऊस पडल्याने प्रचाराचा शेवटचा दिवस असलेल्या शनिवारी पावसाने नेत्यांचा हिरमोड झाला.यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी केवळ १२ दिवसच मिळाले. या बारा दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांच्या नाकी नऊ आले. तत्पूर्वी निवडणुका आॅक्टोबर मध्ये निश्चित असल्याने अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आधी त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन ग्राऊंड तयार केले होते. शेवटच्या आठवडाभरात अनेक उमेदवारांनी त्यांचा शहरीभाग आणि आसपासच्या खेड्यांसाठी राखून ठेवला होता. शनिवारी प्रचार संपणार असल्याने अनेक नेत्यांनी विविध भागांत प्रचार फेºया तसेच कॉर्नर बैठकांचे आयोजन केले होते. परंतु पावसाने हे नियोजन कोलमडले.त्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी ज्या भागात प्रचाराचे नियोजन होते, तेथील नागरिकांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्याचे दिसून आले. सकाळी अनेक रॅली तसेच पदयात्रा काढून प्रचारात रंगत भरण्याचा प्रयत्न झाला. रिमझिम पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर कायकर्ते आणि नेत्यांनी प्रचार कार्यालय, निवासस्थान गाठून पुढील दोन दिवसांच्या नियोजनाचा आढावा घेतला.जालना शहरात सकाळपासून रिमझिम पाऊस होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर, काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल व इतर उमेदवारांनी कॉर्नर बैठका घेऊन गाठीभेटी घेतल्या.परतूरमध्ये बबनराव लोणीकर, सुरेशकुमार जेथलिया व इतरांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला. घनसावंगीत राजेश टोपे, हिकमत उढाण यांनी प्रचारफेरी काढली.भोकरन आणि बदनापूरमध्येही महायुती, आघाडी व इतर उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

टॅग्स :RainपाऊसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालना