शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

परतीच्या पावसाचा प्रचाराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:51 IST

: परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे सकाळपासूनच उमेदवारांना घराबाहेर पडतांना अडचणी आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे सकाळपासूनच उमेदवारांना घराबाहेर पडतांना अडचणी आल्या. तसेच दिवसभर रिमझिम तर कधी धुवाधार पाऊस पडल्याने प्रचाराचा शेवटचा दिवस असलेल्या शनिवारी पावसाने नेत्यांचा हिरमोड झाला.यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी केवळ १२ दिवसच मिळाले. या बारा दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांच्या नाकी नऊ आले. तत्पूर्वी निवडणुका आॅक्टोबर मध्ये निश्चित असल्याने अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आधी त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन ग्राऊंड तयार केले होते. शेवटच्या आठवडाभरात अनेक उमेदवारांनी त्यांचा शहरीभाग आणि आसपासच्या खेड्यांसाठी राखून ठेवला होता. शनिवारी प्रचार संपणार असल्याने अनेक नेत्यांनी विविध भागांत प्रचार फेºया तसेच कॉर्नर बैठकांचे आयोजन केले होते. परंतु पावसाने हे नियोजन कोलमडले.त्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी ज्या भागात प्रचाराचे नियोजन होते, तेथील नागरिकांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्याचे दिसून आले. सकाळी अनेक रॅली तसेच पदयात्रा काढून प्रचारात रंगत भरण्याचा प्रयत्न झाला. रिमझिम पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर कायकर्ते आणि नेत्यांनी प्रचार कार्यालय, निवासस्थान गाठून पुढील दोन दिवसांच्या नियोजनाचा आढावा घेतला.जालना शहरात सकाळपासून रिमझिम पाऊस होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर, काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल व इतर उमेदवारांनी कॉर्नर बैठका घेऊन गाठीभेटी घेतल्या.परतूरमध्ये बबनराव लोणीकर, सुरेशकुमार जेथलिया व इतरांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला. घनसावंगीत राजेश टोपे, हिकमत उढाण यांनी प्रचारफेरी काढली.भोकरन आणि बदनापूरमध्येही महायुती, आघाडी व इतर उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

टॅग्स :RainपाऊसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालना