शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शिक्षकांवर पिढी घडविण्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:58 IST

विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. ही जबादारी शिक्षकांनी प्रमाणिकपणे पार पाडल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल घडू शकते. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. ही जबादारी शिक्षकांनी प्रमाणिकपणे पार पाडल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल घडू शकते. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी रामनगर येथे केले. शिक्षकांच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.रामनगर येथील समाजकार्य महाविद्यालयात हडपसावरगाव अंतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षकांसाठी बीटस्तरीय कार्याशाळा आयोजिण्यात आली होती. त्यात २४० शिक्षकांचा सहभाग होता. यावेळी डायटचे प्राचार्य जगराम भाटकर, शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, रवी जोशी, डॉ. प्रकाश मांटे, विस्तार अधिकारी भारत वानखेडे, बाळासाहेब खरात यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना अरोरा म्हणाल्या की, शिक्षकांवर समाज घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. त्या बद्दल त्यांना आता झोकून देऊन काम करावे लागेल. शिक्षण देताना ते विद्यार्थ्यांना मनापासून दिले पाहिजे. केवळ कोणी आपली स्तुती अथवा एखादा पुरस्कार देऊन गौरव करेल ही आशा न ठेवता विद्यादान करण्याचे अरोरा म्हणाल्या. शिक्षकांनी शाळेच्या वेळेत शाळेत राहणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास आपण केव्हाही शाळेला अचानक भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगून दोषी शिक्षकांची गय केली जाणार नाही, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी वृक्षरोपनाला महत्व देण्याचे सांगून एक मुल एक झाड उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मावकर आणि रमेश हुसे यांनी केले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTeacherशिक्षक