शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बाणेगाव येथे लसीकरणाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

मक्यावर अळीचा प्रादुर्भाव जाफराबाद : यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे. गत आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे पिकेही ...

मक्यावर अळीचा प्रादुर्भाव

जाफराबाद : यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे. गत आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे पिकेही तरारली आहेत. परंतु, मक्यावर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळीचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत.

शिष्यवृत्ती त्वरित वाटप करण्याची मागणी

जालना : भारत सरकार शिष्यवृत्ती त्वरित वाटप करा, शासकीय वसतिगृह त्वरित सुरू करा, त्याचबरोबर मागील वर्षीची आणि या वर्षीची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करा, या विविध मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जालना जिल्हा कमिटीच्या वतीने सामाजिक न्यायमंत्र्यांना सहायक आयुक्त यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

सूचना फलक गायब, चालकांची कसरत

बदनापूर : जालना- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या बदनापूर शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ही बाब पाहता बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खराब रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

शेंडगे विद्यालयात कोरोना योद्धयांचा गौरव

जालना : जालना शहरातील चंदनझिरा भागातील शिवाजीराव शेंडगे विद्यालयातील लसीकरण केंद्रावर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना या विद्यालयाने एक वृक्ष व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आबूज, मार्था वाघमारे, गोकुळा खांडेकर, मंदा वाघमारे आदींची उपस्थिती होती.

मुबलक लसींच्या पुरवठ्याची मागणी

बदनापूर : शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु, अनेक केंद्रांवर अपुरी लस असल्याने तासनतास थांबून अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ही बाब पाहता आरोग्य विभागाने शहरासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर मुबलक लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

खंडित वीजपुरवठा

सेलगाव : बदनापूर तालुक्यातील सेलगावसह परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघु व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय शेतशिवारातील कामेही ठप्प होत आहेत. या भागातील तांत्रिक अडचणी सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या उद्भवत आहे. तरी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रस्ता उखडला

पारध : येथील पारध - पिंपळगाव रेणुकाई हा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात उखडला गेला आहे. दोन महिन्यांपूर्वीच उर्दू शाळा ते पारध या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन महिन्यातच रस्ता उखडला आहे. लक्ष देण्याची मागणी होत आहे.