शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधित १५ मातांच्या बाळांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:51 IST

मागील दोन वर्षात जिल्ह्यातील १८ एचआयव्ही बाधित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. यातील १५ बालकांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील दोन वर्षात जिल्ह्यातील १८ एचआयव्ही बाधित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. यातील १५ बालकांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. तर तीन बालकांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. आरोग्य विभागाच्या वतीने महिलांवर नियमितपणे केलेल्या उपचारामुळे बालकांना एचआयव्हीची लागण झालेली नाही.जिल्ह्यात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. एचआयव्ही बाधितांना सर्वसामान्य नागरिकासारखे जीवन जगता यावे, मातृत्व- दातृत्वाचा लाभ घेता यावा, त्यांच्याकडून जन्माला आलेल्या पाल्यांना एचआयव्हीची लागण होवू नये, यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना यश प्राप्त होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. येथील शासकीय रूग्णालयात एप्रिल २०१७ ते जून २०१९ पर्यंत शेकडो गर्भधारणा झालेल्या महिलांची तपासणी करण्यात आली. यात १९ महिला एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले. या महिलांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून विश्वासात घेवून त्यांच्यावर नियमित औषधोपचार करण्यात आले. यातील १८ महिलांची जून २०१९ पर्यंत शासकीय रूग्णालयात प्रसुती झाली. संबंधित महिलांच्या १५ बाळाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर तीन बालकांचा अहवाल प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.एचआयव्ही ग्रस्त महिलेच्या प्रसुतीच्या ७२ तासानंतर नेव्हीरेपीन सिरप दिली जाते. त्यानंतर सहा आठवडे, बारा आठवडे, सहा महिने, बारा महिने व अठरा महिने यानुसार बालकांची तपासणी केली जाते. शेवटच्या तपासणीत बाळकाचा पॉझेटिव्ह व निगेटिव्ह अहवाल प्राप्त होतो.समाजात आमची एचआयव्हीग्रस्त म्हणून ओळख आहे. परंतु, आमच्या पाल्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे.हा आनंद गगनात न मावणारा असल्याच्या भावना एचआयव्हीग्रस्त मातांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :HIV-AIDSएड्सWomenमहिलाnew born babyनवजात अर्भक