शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ग्रामसेवकांचा अहवाल शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:31 IST

८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महिन्यभरापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर ५७ ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने मागितला असून, तो अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शौचालयाच्या बांधकामात अनियमितता केल्याप्रकरणी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी १३८ ग्रामसेवकांवर कारवाई केली होती. या ग्रामसेवकांच्या कामाची चौकशी करुन त्यातील ८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महिन्यभरापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर ५७ ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने मागितला असून, तो अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने गतवर्षी मोठ्या प्रमाणात शौचालयाची कामे करण्यात आली. लाभार्थ्यांनी शौचालये बांधली.परंतु, अनेक ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान दिलेच नाही. काही ग्रामसेवकांनी या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याच्या अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे आल्या होत्या.या प्रकरणाची चौकशी करुन सीईओंनी १३८ ग्रामसेवकांना नोटिसा पाठवून वेतनवाढ बंद करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर खुलासे सादर करण्याचे सांगितले होते. काही ग्रामसेवकांनी खुलासे सादर केले असून, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. तर ५१ ग्रामसेवकांनी अद्यापही खुलासे सादर केले नाही. अशा ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने माघितला असून, तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले.कारवाई मागे घेण्यासाठी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन केले होते. ग्रामसेवकांनी स्वच्छ भारत मिशनच्या सर्वच कामांवर बहिष्कार टाकला होता.त्यानंतर सीईओंनी ग्रामसेवक संघटनांची बैठक घेऊन ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, ५१ ग्रामसेवकांवर शासन काय? कारवाई करते हे पाहणे औचित्याचे ठरणार असून, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी महिन्यभरापूर्वींच विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या कारवाया रिलीज करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. दररोज जि.प. प्रशासनाकडून विभागीय कार्यालयाकडे विचारणा केली जात आहे. परंतु, योग्य उत्तर मिळत नाही.८१ ग्रामसेवकांनी खुलासे सादर केले आहेत. त्याची पडताळणी करुन ८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे.-निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयgram panchayatग्राम पंचायत