शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ग्रामसेवकांचा अहवाल शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:31 IST

८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महिन्यभरापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर ५७ ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने मागितला असून, तो अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शौचालयाच्या बांधकामात अनियमितता केल्याप्रकरणी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी १३८ ग्रामसेवकांवर कारवाई केली होती. या ग्रामसेवकांच्या कामाची चौकशी करुन त्यातील ८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महिन्यभरापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर ५७ ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने मागितला असून, तो अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने गतवर्षी मोठ्या प्रमाणात शौचालयाची कामे करण्यात आली. लाभार्थ्यांनी शौचालये बांधली.परंतु, अनेक ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान दिलेच नाही. काही ग्रामसेवकांनी या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याच्या अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे आल्या होत्या.या प्रकरणाची चौकशी करुन सीईओंनी १३८ ग्रामसेवकांना नोटिसा पाठवून वेतनवाढ बंद करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर खुलासे सादर करण्याचे सांगितले होते. काही ग्रामसेवकांनी खुलासे सादर केले असून, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. तर ५१ ग्रामसेवकांनी अद्यापही खुलासे सादर केले नाही. अशा ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने माघितला असून, तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले.कारवाई मागे घेण्यासाठी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन केले होते. ग्रामसेवकांनी स्वच्छ भारत मिशनच्या सर्वच कामांवर बहिष्कार टाकला होता.त्यानंतर सीईओंनी ग्रामसेवक संघटनांची बैठक घेऊन ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, ५१ ग्रामसेवकांवर शासन काय? कारवाई करते हे पाहणे औचित्याचे ठरणार असून, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी महिन्यभरापूर्वींच विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या कारवाया रिलीज करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. दररोज जि.प. प्रशासनाकडून विभागीय कार्यालयाकडे विचारणा केली जात आहे. परंतु, योग्य उत्तर मिळत नाही.८१ ग्रामसेवकांनी खुलासे सादर केले आहेत. त्याची पडताळणी करुन ८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे.-निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयgram panchayatग्राम पंचायत