शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:05 IST

शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांची चारा छावणीला भेट : शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली.रविवारी ठाकरे येणार म्हणून साळेगाव परिसरात मोठे उत्साही वातावरण होते. ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा साळेगावच्या प्रवेशव्दारावर येताच त्यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखेच्या नामफलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम संपल्यावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक सजवलेली बैलगाडी तयार ठेवली होती. परंतु ठाकरे यांनी त्यात बसणे टाळले. त्यांनी थेट चारा छावणीत जाऊन जनावरांना वैरण दिले. तसेच तेथील जनावरांच्या मालकांशी संवाद साधून मुबलक चारा, पाणी येथे मिळते काय, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या चेहºयावरही एक प्रकारची चिंता आणि शेतकºयांबद्दल असलेला जिव्हाळा दिसून आला.केवळ शेतक-यांसाठी ठाकरे हे विशेष विमानाने रविवारी सकाळी औरंगाबादला आले आणि नंतर हॅलिकॉप्टरने ते जालन्यात आले. शेतकºयांना मदत वाटपासाठी एखाद्या बड्या नेत्याने विमान आणि हॅलीकॉप्टरने येऊन जी मदत केली. त्याबद्दल उपस्थितांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ठाकरे यांनी जालन्यात आल्यावर प्रथम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली.पाणी वळवणे गरजेचे -जयदत्त क्षीरसागरसंपूर्ण मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नद्याचे पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यात वळवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी मंत्री असताना त्याचा आराखडा तयार असून, त्याला जास्त निधीची गरज आहे.हा निधी मिळाल्यास हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकेल. तसेच झाल्यास मराठवाड्यातील पाणी प्रश्न संपूर्णपणे निकाली निघेल असे प्रतिपादन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शिवसेनेची मदतमराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी आम्ही सरकार म्हणून पुढाकार घेत आहोत. परंतु केवळ सरकारी मदतीवर विसंबून न राहता, शेतकºयांना तातडीने मदत व्हावी या हेतूने आजचा हा कार्यक्रम खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्षात आणला आहे.सेना शेतकºयांसाठी नेहमी धावून येते. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी क्षीरसागर यांनी जो आराखडा सूचविला आहे, त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही तो मुद्दा मांडू, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :JalanaजालनाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAgriculture Sectorशेती क्षेत्र