शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेखा बैजल यांच्या ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:02 IST

इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.प्रसिध्द साहित्यिक रेखा बैजल यांनी मराठीत लिहिलेल्या ‘अग्निपुष्प’ या कादंबरीचे हिंदी भाषांतर त्यांचे पती शिवकुमार बैजल यांनी केले. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधत शनिवारी या कादंबरीचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. राम अग्रवाल हे होते. प्रारंभी शिवकुमार बैजल यांनी प्रास्ताविकातून ‘अग्निपुष्प’चे हिंदी भाषांतर कशामुळे केले. याचे विवेचन केले. व्यासपीठावर रेखा बैजल, राम अग्रवाल, सुरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. रणसुभे म्हणाले की, साहित्यातून मानवी मूल्यांची उदात्तता परिवर्तित होत असते. ही मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होतात. अंतर्मनातील चलबिचल साहित्यातून मांडता येते. हे मांडण्यासाठी मोठे धाडस लागते. जे मनात असते तेच शब्दरूपातून त्याला ताकद देणारेच साहित्यिक होऊ शकतात, असेही ते म्हणाले. आज देशाच्या कुठल्याच राज्याची अथवा प्रदेशाची मातृभाषा नसणारी हिंदी भाषा ही भारताची जनभाषा बनली आहे. शंभर कोटी लोक हिंदीचा उपयोग आपल्या व्यवहारासाठी करतात, ही हिंदी भाषेसाठी गौरवाची बाब आहे. देशाच्या अखंडतेसाठी देखील हिंदी भाषेचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, असे म्हणण्याची परंपरा आहे. परंतु, येथे पतीच्या रूपाने शिवकुमार बैजल यांनी रेखा बैजल यांना मोठी साथ दिल्याचे त्यांनी कौतुक केले.प्राचार्य राम अग्रवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला. रेखा बैजल यांच्या कथा, कादंबºया आणि कविता या प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रतिभा श्रीपत यांनी केले. कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, साहित्यिक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हिंदी कवी संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक