शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेखा बैजल यांच्या ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:02 IST

इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.प्रसिध्द साहित्यिक रेखा बैजल यांनी मराठीत लिहिलेल्या ‘अग्निपुष्प’ या कादंबरीचे हिंदी भाषांतर त्यांचे पती शिवकुमार बैजल यांनी केले. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधत शनिवारी या कादंबरीचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. राम अग्रवाल हे होते. प्रारंभी शिवकुमार बैजल यांनी प्रास्ताविकातून ‘अग्निपुष्प’चे हिंदी भाषांतर कशामुळे केले. याचे विवेचन केले. व्यासपीठावर रेखा बैजल, राम अग्रवाल, सुरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. रणसुभे म्हणाले की, साहित्यातून मानवी मूल्यांची उदात्तता परिवर्तित होत असते. ही मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होतात. अंतर्मनातील चलबिचल साहित्यातून मांडता येते. हे मांडण्यासाठी मोठे धाडस लागते. जे मनात असते तेच शब्दरूपातून त्याला ताकद देणारेच साहित्यिक होऊ शकतात, असेही ते म्हणाले. आज देशाच्या कुठल्याच राज्याची अथवा प्रदेशाची मातृभाषा नसणारी हिंदी भाषा ही भारताची जनभाषा बनली आहे. शंभर कोटी लोक हिंदीचा उपयोग आपल्या व्यवहारासाठी करतात, ही हिंदी भाषेसाठी गौरवाची बाब आहे. देशाच्या अखंडतेसाठी देखील हिंदी भाषेचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, असे म्हणण्याची परंपरा आहे. परंतु, येथे पतीच्या रूपाने शिवकुमार बैजल यांनी रेखा बैजल यांना मोठी साथ दिल्याचे त्यांनी कौतुक केले.प्राचार्य राम अग्रवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला. रेखा बैजल यांच्या कथा, कादंबºया आणि कविता या प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रतिभा श्रीपत यांनी केले. कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, साहित्यिक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हिंदी कवी संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक