शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रेखा बैजल यांच्या ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:02 IST

इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.प्रसिध्द साहित्यिक रेखा बैजल यांनी मराठीत लिहिलेल्या ‘अग्निपुष्प’ या कादंबरीचे हिंदी भाषांतर त्यांचे पती शिवकुमार बैजल यांनी केले. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधत शनिवारी या कादंबरीचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. राम अग्रवाल हे होते. प्रारंभी शिवकुमार बैजल यांनी प्रास्ताविकातून ‘अग्निपुष्प’चे हिंदी भाषांतर कशामुळे केले. याचे विवेचन केले. व्यासपीठावर रेखा बैजल, राम अग्रवाल, सुरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. रणसुभे म्हणाले की, साहित्यातून मानवी मूल्यांची उदात्तता परिवर्तित होत असते. ही मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होतात. अंतर्मनातील चलबिचल साहित्यातून मांडता येते. हे मांडण्यासाठी मोठे धाडस लागते. जे मनात असते तेच शब्दरूपातून त्याला ताकद देणारेच साहित्यिक होऊ शकतात, असेही ते म्हणाले. आज देशाच्या कुठल्याच राज्याची अथवा प्रदेशाची मातृभाषा नसणारी हिंदी भाषा ही भारताची जनभाषा बनली आहे. शंभर कोटी लोक हिंदीचा उपयोग आपल्या व्यवहारासाठी करतात, ही हिंदी भाषेसाठी गौरवाची बाब आहे. देशाच्या अखंडतेसाठी देखील हिंदी भाषेचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, असे म्हणण्याची परंपरा आहे. परंतु, येथे पतीच्या रूपाने शिवकुमार बैजल यांनी रेखा बैजल यांना मोठी साथ दिल्याचे त्यांनी कौतुक केले.प्राचार्य राम अग्रवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला. रेखा बैजल यांच्या कथा, कादंबºया आणि कविता या प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रतिभा श्रीपत यांनी केले. कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, साहित्यिक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हिंदी कवी संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक