शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:59 IST

प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.

ठळक मुद्देभूर्दंड : महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.जालना शहरासह जिल्ह्यातील तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. काही रस्त्यांची अनेक वर्षापासून दुरुस्ती नसल्याने तर काही रस्त्यांचे काम थातूरमातूर झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अपुरा निधी, निकृष्ट दर्जाची कामे त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम राहिली आहे. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.प्रवाशांसह, नागरिकांची ओरड होऊनही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच दिसून येत आहे. या रस्त्यांवरुन एसटी दैनंदिन प्रवास करत असल्याने लालपरीला मोठे नुकसान सोसावे लागते. बसस्थानकापासून खड्डे पडल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे बस खराब होत आहेत. त्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करतात. जिल्ह्यातील अंबड, परतूर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवासाचे हाल होत आहेत.विद्यार्थ्यांची गैरसोयग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसनेच जातात. परंतु, खराब रस्ता असल्यामुळे परिवहन महामंडळ बस बंद करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबरच प्रवाशांचीही गैरसोय होते. दररोज ग्रामीण भागातून नागरिक शहराकडे येतात. परंतु, बस नसल्यामुळे नागरिकांचे हाल होतात. नाईलाजाने त्यांना खाजगी वाहनांना जास्तीचे पैसे मोजावे लागते.बसस्थानकही होतय हायटेकजालना शहरातील बसस्थानक हायटेक करण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटींचा निधी दिला आहे. यामुळे येणाºया काळात जालना बसस्थाकाचे रुपडे पलटणार आहे. मात्र, बसस्थानकात येणाºया बसेसे या खिळखिळ््या असणार आहेत.टायर होतात खराबखराब रस्त्यावरुन प्रवासादरम्यान बस आदळून खिळखिळी होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे टायर खराब होतात. त्यामुळे वारंवार टायर बदलावे लागते. तसेच कुठेही टायर खराब झाल्याने चालकांसह प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.आजार उध्दभवतातखराब रस्ता असल्यामुळे बस चालवत असलेले चालक व प्रवाशांना शाध्यांच्या आजारांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा गरोदर महिलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. तर वृध्दांना बसने प्रवास करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

टॅग्स :Jalanaजालनाstate transportराज्य परीवहन महामंडळ