शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:59 IST

प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.

ठळक मुद्देभूर्दंड : महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.जालना शहरासह जिल्ह्यातील तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. काही रस्त्यांची अनेक वर्षापासून दुरुस्ती नसल्याने तर काही रस्त्यांचे काम थातूरमातूर झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अपुरा निधी, निकृष्ट दर्जाची कामे त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम राहिली आहे. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.प्रवाशांसह, नागरिकांची ओरड होऊनही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच दिसून येत आहे. या रस्त्यांवरुन एसटी दैनंदिन प्रवास करत असल्याने लालपरीला मोठे नुकसान सोसावे लागते. बसस्थानकापासून खड्डे पडल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे बस खराब होत आहेत. त्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करतात. जिल्ह्यातील अंबड, परतूर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवासाचे हाल होत आहेत.विद्यार्थ्यांची गैरसोयग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसनेच जातात. परंतु, खराब रस्ता असल्यामुळे परिवहन महामंडळ बस बंद करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबरच प्रवाशांचीही गैरसोय होते. दररोज ग्रामीण भागातून नागरिक शहराकडे येतात. परंतु, बस नसल्यामुळे नागरिकांचे हाल होतात. नाईलाजाने त्यांना खाजगी वाहनांना जास्तीचे पैसे मोजावे लागते.बसस्थानकही होतय हायटेकजालना शहरातील बसस्थानक हायटेक करण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटींचा निधी दिला आहे. यामुळे येणाºया काळात जालना बसस्थाकाचे रुपडे पलटणार आहे. मात्र, बसस्थानकात येणाºया बसेसे या खिळखिळ््या असणार आहेत.टायर होतात खराबखराब रस्त्यावरुन प्रवासादरम्यान बस आदळून खिळखिळी होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे टायर खराब होतात. त्यामुळे वारंवार टायर बदलावे लागते. तसेच कुठेही टायर खराब झाल्याने चालकांसह प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.आजार उध्दभवतातखराब रस्ता असल्यामुळे बस चालवत असलेले चालक व प्रवाशांना शाध्यांच्या आजारांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा गरोदर महिलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. तर वृध्दांना बसने प्रवास करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

टॅग्स :Jalanaजालनाstate transportराज्य परीवहन महामंडळ