शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

‘समृद्धी’च्या मोबदल्यातून कर्जाची वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:01 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये नाराजीचा सूर : नागपूर- मुंबई महामार्गासाठी ४५० हेक्टर जमिनीचे संपादन होणार

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.बदनापूर व जालना तालुक्यातील २५ गावांमधील एक हजार १५४ शेतकºयांची सुमारे साडेचारशे हेक्टर जमीन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. यामध्ये जालना तालुक्यातील ७११, तर बदनापूर तालुक्यातील ४४२ शेतकºयांचा समावेश आहे. आतापर्यंत जालना तालुक्यातील अहंकार देळगाव, नंदापूर, थार या गावांमधील १०४ खरेदीखत पूर्ण झाले असून, ५१.९६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे.बदनापूर तालुक्यातील नजिक पांगरी, गेवराई बाजार या गावामधील ८१ खरेदीखत पूर्ण झाले असून, त्यापोटी ४१.१३ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. दोन्ही तालुके मिळून ९६९ खरेदीखतांच्या माध्यमातून ३४७.१० हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे नियोजन आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदी-विक्री प्रक्रियेत महामंडळाकडून शेतकºयांना सुमारे ३५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. समृद्धीसाठी जमीन विक्री केलेल्या बहुतांश शेतकºयांकडे राष्ट्रीयीकृत बँकेचे कृषी कर्ज असून, काही शेतकºयांनी दीर्घ मुदतीचे कर्जही घेतलेले आहे. समृद्धीचा मोबदला शेतकºयांना देताना बँकेचे थकीत कर्ज कपात करून उर्वरित रक्कम शेतकºयांच्या हातावर ठेवली जात आहे. त्यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.कर्जमाफीच्या लाभाबाबत संभ्रम !समृद्धी महामार्गात ज्या शेतकºयांची जमीन जात आहे. त्यातील बहुतांश शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र आहेत.मात्र, काही शेतकºयांची जमीन समृद्धीसाठी खरेदी करतानाच बँकेचे पूर्ण कर्ज कपात करण्यात आले. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास या शेतकºयांना पैसे परत करू, असे सांगण्यात येत आहे. मात्र, एकदा बँकेचे कर्ज फेडल्यास परत कर्जमाफीचा लाभ मिळेला का, याबाबत शेतकºयांध्ये संभ्रम आहे.