शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘समृद्धी’च्या मोबदल्यातून कर्जाची वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:01 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये नाराजीचा सूर : नागपूर- मुंबई महामार्गासाठी ४५० हेक्टर जमिनीचे संपादन होणार

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.बदनापूर व जालना तालुक्यातील २५ गावांमधील एक हजार १५४ शेतकºयांची सुमारे साडेचारशे हेक्टर जमीन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. यामध्ये जालना तालुक्यातील ७११, तर बदनापूर तालुक्यातील ४४२ शेतकºयांचा समावेश आहे. आतापर्यंत जालना तालुक्यातील अहंकार देळगाव, नंदापूर, थार या गावांमधील १०४ खरेदीखत पूर्ण झाले असून, ५१.९६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे.बदनापूर तालुक्यातील नजिक पांगरी, गेवराई बाजार या गावामधील ८१ खरेदीखत पूर्ण झाले असून, त्यापोटी ४१.१३ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. दोन्ही तालुके मिळून ९६९ खरेदीखतांच्या माध्यमातून ३४७.१० हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे नियोजन आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदी-विक्री प्रक्रियेत महामंडळाकडून शेतकºयांना सुमारे ३५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. समृद्धीसाठी जमीन विक्री केलेल्या बहुतांश शेतकºयांकडे राष्ट्रीयीकृत बँकेचे कृषी कर्ज असून, काही शेतकºयांनी दीर्घ मुदतीचे कर्जही घेतलेले आहे. समृद्धीचा मोबदला शेतकºयांना देताना बँकेचे थकीत कर्ज कपात करून उर्वरित रक्कम शेतकºयांच्या हातावर ठेवली जात आहे. त्यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.कर्जमाफीच्या लाभाबाबत संभ्रम !समृद्धी महामार्गात ज्या शेतकºयांची जमीन जात आहे. त्यातील बहुतांश शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र आहेत.मात्र, काही शेतकºयांची जमीन समृद्धीसाठी खरेदी करतानाच बँकेचे पूर्ण कर्ज कपात करण्यात आले. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास या शेतकºयांना पैसे परत करू, असे सांगण्यात येत आहे. मात्र, एकदा बँकेचे कर्ज फेडल्यास परत कर्जमाफीचा लाभ मिळेला का, याबाबत शेतकºयांध्ये संभ्रम आहे.