शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

कर्जमाफीसाठी ४५५ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:05 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजालना : लाभार्थींना रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. तशा आशयाचा संदेशही बँकांकडून लाभार्थ्यांना पाठवला जात आहे. लाभार्थी शेतकºयांचा आकडा वाढणार असून, त्या प्रमाणात निधीही बँकांना मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यशासनाने पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख पंधरा हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करून त्याचे चावडी वाचन पूर्ण करण्यात आले. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण माहिती आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन लाख १२ हजार शेतकºयांची माहिती महा वेबपोर्टलवर भरली आहे. आॅनलाइन भरलेले अर्ज आणि बँकांनी कर्जदार शेतकºयांची आॅनलाइन भरलेली माहिती याचे आधारकार्ड, खाते क्रमांक व अन्य माहितीच्या आधारे संगणकाद्वारे अ‍ॅटो पद्धतीने एकत्रिकरण करून संगणकाद्वारे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. हिरव्या यादीत कर्जमाफीस तात्पुरते पात्र, पिवळ्या यादीत अर्ज भरताना कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित शेतकºयांची नावे, तर लाल यादीत कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतकºयांची नावे आहेत. याद्या अपडेट करताना बँक प्रशासनाचीही दमछाक झाली होती. प्रत्यक्षात महिनाभरात पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केली होती. कागदपत्रांची जमावजमव आणि आॅनलाईन अपग्रेडेशन यामुळे अडचणीत भर पडली. परिणामी दोन महिने या प्रक्रियेस लागले. आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली असून, दोन टप्प्यांत राज्य शासनाने ४५५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी थेट बँकांना दिला आहे. टप्प्याटप्प्याने पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.