शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

चौपदरीकरणासाठीचा प्रस्तावावर पुनर्विचार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:28 IST

अंबड - वडीगोद्री रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहराला बायपास करणे संदर्भात बुधवारी माजी आ. संतोष सांबरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना मुंबई येथ निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड - वडीगोद्री रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहराला बायपास करणे संदर्भात बुधवारी माजी आ. संतोष सांबरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना मुंबई येथ निवेदन दिले.या संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली संतोष सांबरे यांच्या कपात सुचने संदर्भात पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहर बायपास संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व अप्पर मुख्य सचिव मनोजकुमार सौनिक यांना याबाबतचा प्रस्ताव तपासून सादर करण्याचे निर्देश दिले.संतोष सांबरे यांनी सन २०१२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात उपस्थित केलेल्याकपात सूचनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात तसेच बुधवारी चौपदरीकरण तसेच बायपास रस्ता होण्याची आवश्यकता, वाहतूक वर्दळ, अपघाताचे वाढते प्रमाण तसेच ड्रायपोर्ट व स्टिल उद्योगांमुळे जड वाहनांची वाढणारी वाहतूक या संदर्भात सविस्तर विवेचन झाल्यामुळे प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश पाटील यांनी दिले. या रस्त्याचे काम राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण मार्फत सुरु असुन, रस्त्याची रुंदी फक्त १० मीटर आहे,ती वाढवून ३० मीटर करुन चौपदरीकरण करावे, तसेच अंबड शहराच्या वळण रस्त्यासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातुन आर्थिक तरतूद करुन या रस्त्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी संतोष सांबरे यांनी यावेळी केली.शेगाव दिंडीच्या अपघातात १८ वारकरी मृत्यमुखी पडल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात वादळी चर्चा होऊन रस्ता चौपदरीकरण होईल असे सभागृहात तत्कालीन मंत्री सार्वजनिक बांधकाम यांनी जाहीर केल्यानंतर बी.ओ.टी. तत्वावर सदर रस्ता चौपदरीकरण मंजूर झाला होता. परंतु, नंतरच्या काळात चौपदरीकरण रद्द करुन रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. यामुळे चौपदरीकरण आणि बायपास रस्ता मंजूर होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे सांबरे यांनी सांगितले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागchandrakant patilचंद्रकांत पाटील