शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

वास्तव जीवनाची मांडणी म्हणजेच साहित्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:00 IST

साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.

जाफराबाद : साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.येथील समर्थ महाविद्यालयातील बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत शुक्रवारी आयोजित चौथ्या दोन दिवसीय झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.साहित्य संमेलनाचे उद्घाटन खा. राबसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वागताध्यक्षपदी शिवसिंग गौतम, डॉ.संजीवनी तडेगावकर, डी.एन.जाधव, पंडितराव तडेगावकर, सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, सुधीर पाटील, प्राचार्य निवृत्ती दिवटे, मधुकर पडघन, नगरसेवक वसीम जहागीरदार, प्राचार्य संजय गौतम यांची प्रमुख उपस्थिती होती.देशमुख म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणातून साहित्याची निर्मिती केली. याचे खरे श्रेय चव्हाण यांना जाते.शनिवारी समारोप प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया मान्यवरांना कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिदिना निमित्त गौरविण्यात आले. दोन दिवसीय साहित्य संमेलनात कवितांची मेजवानी, लोककलावंतांचा लोकोत्सव, जनजागरण ग्रंथ दिंडी, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कविसंमेलन इ. कार्यक्रम उत्साहात पार पडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय पाटील, प्रा.रंगनाथ खेडेकर यांनी केले. आभार गजानन उदावंत यांनी मानले.------------राजकारण्यांवरही साहित्यनिर्मिती व्हावी- दानवेराजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºयांवर सुद्धा साहित्य निर्मिती होऊ शकते यासाठी पुढाकार घ्यायला हवा. वास्तव जीवनाची मांडणी म्हणजे साहित्य आहे. साहित्यिकांनी मांडणी केलेले विचार रसिकांना आवडतात. मात्र ते आचरणात आणता आले पाहिजे असे रावसाहेब दानवे म्हणाले.