शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘समृद्धी’च्या जमिनीवर ‘रेडीमेड’ झाडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:18 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीत मूल्यांकन वाढवून घेण्यासाठी संयुक्त मोजणीपूर्वीच अनेकांनी बाहेरून आणलेली रेडीमेड झाडे लावून, ती जुनीच असल्याचे दाखविले. तर काही ठिकाणी फळबागांमधील झाडांची संख्या अधिक दाखवून मूल्यांकन वाढवून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेण्याचे प्रकार जालना, औरंगाबाद जिल्ह्यात घडले आहेत.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीत मूल्यांकन वाढवून घेण्यासाठी संयुक्त मोजणीपूर्वीच अनेकांनी बाहेरून आणलेली रेडीमेड झाडे लावून, ती जुनीच असल्याचे दाखविले. तर काही ठिकाणी फळबागांमधील झाडांची संख्या अधिक दाखवून मूल्यांकन वाढवून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेण्याचे प्रकार जालना, औरंगाबाद जिल्ह्यात घडले आहेत.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून तर औरंगाबाद जिल्ह्यातील १५ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. जालना जिल्ह्यात एकूण ५१० तर औरंगाबाद जिल्ह्यातील एक हजार ३४२ हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. ज्या गावांमधील जमिनी समृद्धी महामार्गात जाणार आहे, तिथे सुरुवातीला खुणा रोवून मार्किंग करण्यात आली होती. सॅटेलाईटद्वारे जमिनीचे सर्वेक्षण करून छायाचित्रे घेण्यात आली होती. सॅटेलाईटद्वारे मोजणीची पूर्वकल्पना असल्याने अनेक गावांमध्ये बड्या शेतक-यांनी मोठ्या आकाराची, उंच झाडे बाहेरून विकत आणून महामार्गात जाणा-या जमिनीच्या मधोमध खड्डे खोदून लावली. जालना, औरंगाबादसह, विदर्भ आणि नाशिक विभागातील गावांमध्ये हा प्रकार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल, कृषी व वनविभागामार्फत झालेल्या सयुंक्त मोजणी वेळी लहान-मोठी झाडे, विहिरी, फळबागा, ठिबक सिंचन, तुषार, गोठे आदींचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले. संयुक्त मोजणीत कृत्रिमरीत्या लावलेल्या झाडांची संख्याही गृहित धरण्यात आली. बदनापूर तालुक्यातील गेवराई, अकोला, निकळक, भराडखेडा, नजीकपांगरी, सोमठाणा, जालना तालुक्यातील अहंकारदेऊळगाव, तांदूळवाडी, थार, नाव्हा गुंडेवाडी, जामवाडी यासह अन्य गावांमध्ये असे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी फळबागातील झाडांची संख्या अधिका-यांनीच शेतक-यांशी चर्चा करून वाढवून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. एका झाडांचे मूल्यांकन सातशे ते हजार रुपयांपर्यंत काढण्यात आले आहे. त्याचा मोबदलाही अनेकांना मिळाला आहे. अर्थातच अधिका-यांना, हा प्रकार माहीत असताना याकडे काणाडोळा करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एकीकडे समृद्धी महामार्गातून राज्याच्या विकासाबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे काही उच्चपदस्थ या संधीचा स्वत:च फायदा करून घेण्यासाठी गुंतल्याचे दिसत आहे. या मुद्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे लक्ष देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे .जालना : ६३ टक्के भूसंपादन पूर्ण, २९४ कोटींचा मोबदलाजालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी एकूण ५१० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी ५८९ शेतकºयांच्या ५३५ खरेदीखताच्या माध्यमातून २४६.७६ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. खाजगी व शासकीय मिळून ३२२.७५ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे.मोबदल्यापोटी शेतक-यांना २९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात खाजगी व शासकीय मिळवून ७६९.०७ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, शेतक-यांना आतापर्यंत एकूण ७९५.९९ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.