शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या जमिनीवर ‘रेडीमेड’ झाडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:18 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीत मूल्यांकन वाढवून घेण्यासाठी संयुक्त मोजणीपूर्वीच अनेकांनी बाहेरून आणलेली रेडीमेड झाडे लावून, ती जुनीच असल्याचे दाखविले. तर काही ठिकाणी फळबागांमधील झाडांची संख्या अधिक दाखवून मूल्यांकन वाढवून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेण्याचे प्रकार जालना, औरंगाबाद जिल्ह्यात घडले आहेत.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीत मूल्यांकन वाढवून घेण्यासाठी संयुक्त मोजणीपूर्वीच अनेकांनी बाहेरून आणलेली रेडीमेड झाडे लावून, ती जुनीच असल्याचे दाखविले. तर काही ठिकाणी फळबागांमधील झाडांची संख्या अधिक दाखवून मूल्यांकन वाढवून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेण्याचे प्रकार जालना, औरंगाबाद जिल्ह्यात घडले आहेत.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून तर औरंगाबाद जिल्ह्यातील १५ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. जालना जिल्ह्यात एकूण ५१० तर औरंगाबाद जिल्ह्यातील एक हजार ३४२ हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. ज्या गावांमधील जमिनी समृद्धी महामार्गात जाणार आहे, तिथे सुरुवातीला खुणा रोवून मार्किंग करण्यात आली होती. सॅटेलाईटद्वारे जमिनीचे सर्वेक्षण करून छायाचित्रे घेण्यात आली होती. सॅटेलाईटद्वारे मोजणीची पूर्वकल्पना असल्याने अनेक गावांमध्ये बड्या शेतक-यांनी मोठ्या आकाराची, उंच झाडे बाहेरून विकत आणून महामार्गात जाणा-या जमिनीच्या मधोमध खड्डे खोदून लावली. जालना, औरंगाबादसह, विदर्भ आणि नाशिक विभागातील गावांमध्ये हा प्रकार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल, कृषी व वनविभागामार्फत झालेल्या सयुंक्त मोजणी वेळी लहान-मोठी झाडे, विहिरी, फळबागा, ठिबक सिंचन, तुषार, गोठे आदींचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले. संयुक्त मोजणीत कृत्रिमरीत्या लावलेल्या झाडांची संख्याही गृहित धरण्यात आली. बदनापूर तालुक्यातील गेवराई, अकोला, निकळक, भराडखेडा, नजीकपांगरी, सोमठाणा, जालना तालुक्यातील अहंकारदेऊळगाव, तांदूळवाडी, थार, नाव्हा गुंडेवाडी, जामवाडी यासह अन्य गावांमध्ये असे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी फळबागातील झाडांची संख्या अधिका-यांनीच शेतक-यांशी चर्चा करून वाढवून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. एका झाडांचे मूल्यांकन सातशे ते हजार रुपयांपर्यंत काढण्यात आले आहे. त्याचा मोबदलाही अनेकांना मिळाला आहे. अर्थातच अधिका-यांना, हा प्रकार माहीत असताना याकडे काणाडोळा करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एकीकडे समृद्धी महामार्गातून राज्याच्या विकासाबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे काही उच्चपदस्थ या संधीचा स्वत:च फायदा करून घेण्यासाठी गुंतल्याचे दिसत आहे. या मुद्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे लक्ष देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे .जालना : ६३ टक्के भूसंपादन पूर्ण, २९४ कोटींचा मोबदलाजालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी एकूण ५१० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी ५८९ शेतकºयांच्या ५३५ खरेदीखताच्या माध्यमातून २४६.७६ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. खाजगी व शासकीय मिळून ३२२.७५ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे.मोबदल्यापोटी शेतक-यांना २९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात खाजगी व शासकीय मिळवून ७६९.०७ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, शेतक-यांना आतापर्यंत एकूण ७९५.९९ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.