शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

शिवचरित्र वाचा, व्यसनापासून दूर राहाल- गायत्री सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील श्री वैष्णव परिवाराच्यावतीने गुरुवारी आयोजित ‘व्यसनमुक्ती’ कार्यक्रमात गायत्री सावजी बोलत होत्या. यावेळी ज्ञानेश्वर माउली, ...

भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील श्री वैष्णव परिवाराच्यावतीने गुरुवारी आयोजित ‘व्यसनमुक्ती’ कार्यक्रमात गायत्री सावजी बोलत होत्या. यावेळी ज्ञानेश्वर माउली, संदीप पंडित, गोकूळ सपकाळ, श्रीरंग खडके, शेनफड बारोटे, नीलेश बारोटे, सुशील बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम संत गजानन महाराज व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांच्या काळात आई- बहिणी सुरक्षित होत्या. त्यांच्या अब्रुवर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न केला तर भर चौकात त्या आरोपीचा चौरंगा केला जात होता. आज प्रत्येक दिवशी भरदिवसा शेकडो आई- बहिणींची अब्रू लुटल्या जात असल्याच्या घटना विविध वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी मिळतात. यासाठी आज देशात पुन्हा एकदा छत्रपती शासन आणण्याचीदेखील गरज असल्याचे मत गायत्री सावजी यांनी व्यक्त केले.

चौकट

आज देशात शिवरायांच्या नावाखाली राजकारण केल्या जात आहे; मात्र शिवरायांनी कधीही जातीयतेला थारा लागू दिला नाही. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली; परंतु आज राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण केले जात आहे. धर्मा-धर्मात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही खूप मोठी शोकांतिका असून, आपण शिवरायांच्या मातृभुमीत जन्म घेतला आहे, यासाठी आपण शिवरायांचे विचार अमलात आणून जीवन जगले पाहिजे, असे आवाहनही गायत्री सावजी यांनी केले.

फोटो ओळ - शेलूद येथे व्यसनमुक्ती कार्यक्रमात शिवव्याख्यात्या गायत्री सावजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेलुदकर महाराज यांच्यासह उपस्थित नागरिक.