शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
2
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
3
'मी लहान लहान मुलांना...', बंगळुरू चेंगराचेंगरीसंदर्भात बोलताना डीके शिवकुमार भावुक
4
ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण?
5
"मी स्टार, ती फक्त मॉडेल होती" दीपिकाला डेट करणाऱ्या अभिनेत्यानं सांगितलं ब्रेकअपचं कारण!
6
तेजी कायम! निफ्टी-सेन्सेक्स 'हिरवेगार', झोमॅटो, रिलायन्स आणि संरक्षण कंपन्यांचे शेअर्स तेजीत!
7
Vastu Shastra: घराचे करा नंदनवन; जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आणा 'ही' लाभदायी रोपं!
8
Rocky Jaiswal : कोण आहे रॉकी जयस्वाल, हिना खानसोबत कुठे झाली पहिली भेट? १३ वर्षे एकमेकांना केलं डेट
9
कोर्टातील कोठडीमध्ये दोन गटांमध्ये हामामारी, एका कैद्याचा मृत्यू
10
फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!
11
बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही
12
भारताच्या युट्यूबर्सना जाळ्यात अडकवणारी 'मॅडम एन' आहे तरी कोण? पहलगाम हल्ल्याशीही कनेक्शन
13
IND vs ENG : टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंडनं अशी केलीये संघ बांधणी
14
सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”
15
उपचारासाठी बलात्कार पीडितेच्या घरी गेलेल्या डॉक्टरला तालिबानी शिक्षा; फरफटत नेले अन्...
16
ब्रिटानियासाठी अनेक दशकं बिस्किट्स बनवायची 'ही' कंपनी; आता होणार बंद होणार, कारण काय?
17
मोठी बातमी! भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमान; दसॉल्ट आणि टाटा समुहाचा करार
18
शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी
19
"कुटुंब बनवण्यासाठी लग्नाची गरज नाही..."; हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, काय आहे खटला?
20
अयोध्येतील राम मंदिरामधील राम दरबाराचे फोटो समोर, अशी संपन्न झाली प्राणप्रतिष्ठापना

अर्थसंकल्प उर्वरित प्रतिक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते त्यामध्ये ...

आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते त्यामध्ये ७५ हजार कोटी रुपयांवरून ६५ हजार कोटी रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या तुटपुंज्या लाभापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. याबरोबरच एम.एस.पी. दीडपट दिली जाणार अशी घोषणा केली गेली; परंतु वस्तुस्थिती एम.एस.पी.साठीची तरतूद दीडपट केली जाणार आहे. हा शब्दांचा खेळ आहे. विमा क्षेत्रात ७४ टक्क्यांपर्यंत विदेशी गुंतवणूक केली जाऊ शकेल, आजपर्यंत ही मर्यादा ४९ टक्के इतकी होती. यामुळे विमा क्षेत्र विदेशी खाजगी भांडवलदारांच्या हाती जाईल.

सरकारच्या माध्यमातून रेल्वे, एअरपोर्ट, रस्ते, वीज, शेती, वेअर हाऊसेस, बंदरे, यासह तेवीस सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली जात आहे. हे देशातील सुजाण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. एकूणच हा अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा आहे.

-डॉ मारोती तेगमपुरे,

अर्थशास्त्र विभागप्रमुख,

गोदावरी महाविद्यालय, अंबड, जि. जालना

...................

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक व निवृत्तीधारकांना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नाही. आयकर तपासणी फक्त तीन वर्षांपर्यंत मागे जाऊन करता येणार आहे. छोट्या करदात्यांसाठी नवीन फेसलेस योजना आणली आहे. सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा ९.५ टक्के जास्त झाल्याने सरकार ती भरपाई संपत्ती विकून पूर्ण करणार आहे. एकूणच जीएसटी कायद्यातही अनेक सकारात्मक बदल केले आहेत.

-डॉ. चंद्रशेखर चोबे

कर सल्लागार

....................

पायाभूत सुविधांवर भर

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा वाढीसाठी मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे आशेचा नवीन किरण समोर आला आहे. शिक्षण, आरोग्य, वाहतूक यावरही भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे कर सवलत वगळता हा अर्थसंकल्प सर्वार्थाने चांगला म्हणावा लागेल.

-निखिल बाहेती, सी.ए.

...................

पारदर्शकतेला महत्त्व

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल व्यवहारांना महत्त्व देऊन पारदर्शकता आणण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल, चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढविल्याने त्यातून कर मिळण्यास अधिक वाव आहे, सैनिकी शाळा, एकलव्य योजना आणि जनगणना हे देखील चांगले उपक्रम म्हणावे लागतील.

-प्रा. सुखदेव मांटे

...............