शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

अर्थसंकल्प उर्वरित प्रतिक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते त्यामध्ये ...

आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते त्यामध्ये ७५ हजार कोटी रुपयांवरून ६५ हजार कोटी रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या तुटपुंज्या लाभापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. याबरोबरच एम.एस.पी. दीडपट दिली जाणार अशी घोषणा केली गेली; परंतु वस्तुस्थिती एम.एस.पी.साठीची तरतूद दीडपट केली जाणार आहे. हा शब्दांचा खेळ आहे. विमा क्षेत्रात ७४ टक्क्यांपर्यंत विदेशी गुंतवणूक केली जाऊ शकेल, आजपर्यंत ही मर्यादा ४९ टक्के इतकी होती. यामुळे विमा क्षेत्र विदेशी खाजगी भांडवलदारांच्या हाती जाईल.

सरकारच्या माध्यमातून रेल्वे, एअरपोर्ट, रस्ते, वीज, शेती, वेअर हाऊसेस, बंदरे, यासह तेवीस सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली जात आहे. हे देशातील सुजाण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. एकूणच हा अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा आहे.

-डॉ मारोती तेगमपुरे,

अर्थशास्त्र विभागप्रमुख,

गोदावरी महाविद्यालय, अंबड, जि. जालना

...................

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक व निवृत्तीधारकांना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नाही. आयकर तपासणी फक्त तीन वर्षांपर्यंत मागे जाऊन करता येणार आहे. छोट्या करदात्यांसाठी नवीन फेसलेस योजना आणली आहे. सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा ९.५ टक्के जास्त झाल्याने सरकार ती भरपाई संपत्ती विकून पूर्ण करणार आहे. एकूणच जीएसटी कायद्यातही अनेक सकारात्मक बदल केले आहेत.

-डॉ. चंद्रशेखर चोबे

कर सल्लागार

....................

पायाभूत सुविधांवर भर

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा वाढीसाठी मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे आशेचा नवीन किरण समोर आला आहे. शिक्षण, आरोग्य, वाहतूक यावरही भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे कर सवलत वगळता हा अर्थसंकल्प सर्वार्थाने चांगला म्हणावा लागेल.

-निखिल बाहेती, सी.ए.

...................

पारदर्शकतेला महत्त्व

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल व्यवहारांना महत्त्व देऊन पारदर्शकता आणण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल, चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढविल्याने त्यातून कर मिळण्यास अधिक वाव आहे, सैनिकी शाळा, एकलव्य योजना आणि जनगणना हे देखील चांगले उपक्रम म्हणावे लागतील.

-प्रा. सुखदेव मांटे

...............