शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

रावसाहेब दानवे यांच्याकडून लोकसभेसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:16 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली.

ठळक मुद्देजालन्यात बैठक : लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी बुथ पातळीवर कार्यकर्त्यांनी कशी तयारी करावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येऊन, उपस्थित पदाधिकाºयांचे म्हणणे जाणून घेतले.येथील बीज शितल सिडस्च्या जालना-औरंगाबाद मार्गावरील सभागृहात ही बैठक पार पडली. दुपारी तब्बल तीन तास बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अचानक बोलावलेल्या या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते किती तत्पर आहेत, याची चाचपणी करण्यात आली. या बैठकीतस पैठण, फुलंब्री, सिल्लाडेसह जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी हजर होते. यावेळी भाजपने या बैठकीविषयी कमलीची गुप्तता पाळली होती.बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्या समोर विरोधक कोणीही असो, त्याची चिंता आपल्या कार्यकर्त्यांनी करण्याची गरज नाही. निवडणुका या संघटनात्मक बांधणीतून जिंकता येतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच भाजपकडून यापूर्वीही अशाच प्रकारची बैठक राजूर येथे घेतली होती. दरम्यान जालना लोकसभा निवडणुकीचा विचार करता येथे विद्यमान खा. रावसाहेब दानवे हे सलग चारवेळेस येथून विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची ही पाचवी टर्म असणार आहे.ते स्वत: प्रदेशाध्यक्ष असल्याने ते स्वत:च्या मतदार संघाची आधीच मोर्चेबांधणी पक्की करून घेत आहेत. कारण नंतर त्यांना निवडणुका लागल्यावर संपूर्ण राज्याचा प्रचार दौरा करावा लागणार असल्याने ते या मतदार संघात वेळ देऊ शकणार नसल्याने ही तयारी असल्याचे बोलले जात आहे.विरोधकां बाबत संभ्रम कायमजालना लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण यांनी नुककताच झंझावती दौरा करून जालन्यातील प्रमुख संस्थांमध्ये सभा घेऊन पेरणी सुरू केली आहे. तर श्विसेना, भाजप युती बाबत अद्याप निर्णय न झाल्याने लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी सज्ज असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील त्यांचे राजकीय पत्ते अद्याप न उघडल्याने संभ्रम कायम असल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदार संघ हा काँग्रेससाठी सुटलेला आहे.

टॅग्स :JalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवेElectionनिवडणूक