शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राणी उंचेगावकरांच्या संभाषणामध्ये होतोय अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे ...

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे असतानाही एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होत आहे. विशेष म्हणजे, मागील दोन ते तीन वर्षांपासून मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. अनेकवेळा संबंधित कंपन्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

माहिती आणि प्रसारणाच्या या युगात मोबाइल हे महत्त्वाचे साधन आहे. नागरिकांना शासकीय असलेल्या बीएसएनएलसह इतर कंपन्यांकडून सेवा दिली जाते. लोकांनी आपल्याच कंपनीला प्राधान्य द्यावे, यासाठी कंपन्यांकडून आकर्षक ऑफर दिल्या जातात, तसेच जाहिरातींद्वारे आमच्याचं कंपनीचे नेटवर्क चांगले असल्याचे दाखविले जाते. कंपन्यांच्या आकर्षक ऑफर व जाहिरातीमध्ये दाखविलेली नेटवर्कची सुविधा यामुळे बहुतांश लोक संबंधित कंपनीचे ग्राहक बनतात; परंतु ग्रामीण भागात गेल्यावर एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होते.

घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात बीएसएनएलचे एक व खासगी कंपनीचे एक असे दोन टॉवर आहेत. हे टॉवर्स असतानाही ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही. नेटवर्क मिळत नसल्याने राणी उंचेगावसह तळेगाव, भुतेगाव, दाई अंतरवाली, मानेपुरी, राठी अंतरवाली, शेवगळ, मुढेगाव या गावांतील नागरिक त्रस्त आहेत. अनेकवेळा संबंधितांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेटवर्क मिळत नसल्याने शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालये व बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ग्राहकांची होतेय लूट

कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. त्यानंतर ग्राहकाही एकदाच दोन ते तीन महिन्यांचे रिचार्ज टाकतात; परंतु नेटवर्क नसल्याने रिचार्जचा पुरेपूर वापर केला जात नाही. मुदत संपली की, कंपनी रिचार्ज परत घेते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागते.

गावामध्ये नेटवर्क नसल्याने संभाषणामध्ये अडथळ होतो. यामुळे ऑनलाइन कामकाजही ठप्प झाले आहे. ऑनलाइन काम करायचे असेल तर घनसावंगी किंवा जालना शहरात जावे लागते. याबाबत अनेकवेळा तक्रारी देखील करण्यात आल्या; परंतु काहीच फायदा झाला नाही. आमच्याकडे मोबाइल असून नसल्यासारखा झाला आहे.

गजानन मंडाळ, ग्रामस्थ, मानेपुरी