शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

राणी उंचेगावकरांच्या संभाषणामध्ये होतोय अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे ...

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे असतानाही एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होत आहे. विशेष म्हणजे, मागील दोन ते तीन वर्षांपासून मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. अनेकवेळा संबंधित कंपन्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

माहिती आणि प्रसारणाच्या या युगात मोबाइल हे महत्त्वाचे साधन आहे. नागरिकांना शासकीय असलेल्या बीएसएनएलसह इतर कंपन्यांकडून सेवा दिली जाते. लोकांनी आपल्याच कंपनीला प्राधान्य द्यावे, यासाठी कंपन्यांकडून आकर्षक ऑफर दिल्या जातात, तसेच जाहिरातींद्वारे आमच्याचं कंपनीचे नेटवर्क चांगले असल्याचे दाखविले जाते. कंपन्यांच्या आकर्षक ऑफर व जाहिरातीमध्ये दाखविलेली नेटवर्कची सुविधा यामुळे बहुतांश लोक संबंधित कंपनीचे ग्राहक बनतात; परंतु ग्रामीण भागात गेल्यावर एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होते.

घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात बीएसएनएलचे एक व खासगी कंपनीचे एक असे दोन टॉवर आहेत. हे टॉवर्स असतानाही ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही. नेटवर्क मिळत नसल्याने राणी उंचेगावसह तळेगाव, भुतेगाव, दाई अंतरवाली, मानेपुरी, राठी अंतरवाली, शेवगळ, मुढेगाव या गावांतील नागरिक त्रस्त आहेत. अनेकवेळा संबंधितांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेटवर्क मिळत नसल्याने शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालये व बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ग्राहकांची होतेय लूट

कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. त्यानंतर ग्राहकाही एकदाच दोन ते तीन महिन्यांचे रिचार्ज टाकतात; परंतु नेटवर्क नसल्याने रिचार्जचा पुरेपूर वापर केला जात नाही. मुदत संपली की, कंपनी रिचार्ज परत घेते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागते.

गावामध्ये नेटवर्क नसल्याने संभाषणामध्ये अडथळ होतो. यामुळे ऑनलाइन कामकाजही ठप्प झाले आहे. ऑनलाइन काम करायचे असेल तर घनसावंगी किंवा जालना शहरात जावे लागते. याबाबत अनेकवेळा तक्रारी देखील करण्यात आल्या; परंतु काहीच फायदा झाला नाही. आमच्याकडे मोबाइल असून नसल्यासारखा झाला आहे.

गजानन मंडाळ, ग्रामस्थ, मानेपुरी