शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

घनसावंगीवर राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:54 IST

घनसावंगी मतदार संघात गुरूवारी झालेल्या मतमोजणीत प्रक्रियेत प्रशासकीय कासवगती आणि तांत्रिक अडचणीचा कहर झाला

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी/ कुंभार पिंपळगाव: घनसावंगी मतदार संघात गुरूवारी झालेल्या मतमोजणीत प्रक्रियेत प्रशासकीय कासवगती आणि तांत्रिक अडचणीचा कहर झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांना शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी मोठे आव्हान दिले होते. अखेरच्या फेरीत तीन ठिकाणच्या मशीनला तांत्रिक अडचणी आल्याने निकाल हाती लागण्यास मोठा उशीर झाला. मात्र, तीन हजारांच्या आसपास टोपे यांना मताधिक्य मिळाल्याने टोपे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदार संघ सलग चार वेळेस आपल्या ताब्यात ठेवला आहे. पाचव्या वेळेस यंदा झालेल्या निवडणुकीत टोपे यांना शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी तगडे आव्हान दिले होते. टोपे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी सभा घेतल्या. तर उढाण यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह इतर नेतेमंडळींनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले होते.राजेश टोपे यांनी मंत्रीपद असताना व विरोधी पक्षात काम करताना केलेल्या विकास कामांची माहिती देत प्रचार यंत्रणा राबविली होती. शहरासह ग्रामीण भागातील यंत्रणेवरही त्यांनी जोर दिला होता. तर शिवसेनेचे उढाण यांनी मतदार संघातील प्रश्नांना हात घालत टोपे यांच्यावर आरोपांच्या फैरी केल्या होत्या. शिवाय साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते. शहरी, ग्रामीण भागातील प्रश्नांना उढाण यांनी हात घातल्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर झाल्याचे मतमोजणीत दिसून आले. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये टोपे यांना मिळालेली लीड उढाण यांनी मोडीत काढली होती. त्यानंतर मात्र, शेवटच्या टप्प्यापर्यंत उढाण यांचीच आघाडी कायम होती. टोपे यांच्या अनेक समर्थकांनी पराभव ग्राह्य धरला होता. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये राजेश टोपे यांना मताधिक्य मिळाले.राजेश टोपे यांना जवळपास तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, अंतिम फेरीत काही मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी अभियंत्यांना पाचरण करण्यात आले होते. मात्र, अटी-तटीची लढत झालेल्या या मतदार संघातील निकालाकडे अवघ्या जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती.राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांना तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तांत्रिक बिघाड झालेल्या मतदान यंत्रातील मतदान १७०० च्या आसपास होते. त्यामुळे टोपे यांचा विजय निश्चित मानून समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सकाळी ८ वाजल्यापासून या मतदार संघात सुरू झालेली मतमोजणी ही कासव गतीनेच होती. मतमोजणी प्रक्रिया सर्वात संथ गतीने सुरू राहिल्याने उमेदवारांसह समर्थकांमध्येही तणावाचे वातावरण होते. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनीही याकडे लक्ष देऊन तो दूर करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा प्रशासनाने निकाल जाहीर करून टोपे यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले.अटी-तटीच्या झालेल्या निवडणुकीत अखेरच्या फेरीदरम्यान राजेश टोपे यांनी साधारणत: तीन हजारांहून अधिकचे मताधिक्य घेतले होते. ज्या मतदान यंत्रामध्ये बिघाड होता, त्यात मतदानाची संख्या कमी होती. त्यामुळे राजेश टोपे यांचा विजय निश्चित मानून समर्थकांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी टोपे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. अनेक फेºयांमध्ये उढाण हे पुढे असल्याने समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. मात्र, अखेरच्या फे-यांमध्ये टोपे यांनी बाजी मारली.टोपे यांना १०७८४९, हिकमत उढाण यांना १०४४४०, शेख हसनोद्दीन यांना १०७४, डॉ. अप्पासाहेब कदम यांना ५५५, अशोक आटोळे यांना ५९२, विष्णू शेळके यांना ९२९३, अमजद काजी यांना २५२, कल्याण चिमणे यांना ४७७, कैलास चोरमारे यांना ७२३ मते मिळाली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपे