शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

घनसावंगीवर राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:54 IST

घनसावंगी मतदार संघात गुरूवारी झालेल्या मतमोजणीत प्रक्रियेत प्रशासकीय कासवगती आणि तांत्रिक अडचणीचा कहर झाला

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी/ कुंभार पिंपळगाव: घनसावंगी मतदार संघात गुरूवारी झालेल्या मतमोजणीत प्रक्रियेत प्रशासकीय कासवगती आणि तांत्रिक अडचणीचा कहर झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांना शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी मोठे आव्हान दिले होते. अखेरच्या फेरीत तीन ठिकाणच्या मशीनला तांत्रिक अडचणी आल्याने निकाल हाती लागण्यास मोठा उशीर झाला. मात्र, तीन हजारांच्या आसपास टोपे यांना मताधिक्य मिळाल्याने टोपे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदार संघ सलग चार वेळेस आपल्या ताब्यात ठेवला आहे. पाचव्या वेळेस यंदा झालेल्या निवडणुकीत टोपे यांना शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी तगडे आव्हान दिले होते. टोपे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी सभा घेतल्या. तर उढाण यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह इतर नेतेमंडळींनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले होते.राजेश टोपे यांनी मंत्रीपद असताना व विरोधी पक्षात काम करताना केलेल्या विकास कामांची माहिती देत प्रचार यंत्रणा राबविली होती. शहरासह ग्रामीण भागातील यंत्रणेवरही त्यांनी जोर दिला होता. तर शिवसेनेचे उढाण यांनी मतदार संघातील प्रश्नांना हात घालत टोपे यांच्यावर आरोपांच्या फैरी केल्या होत्या. शिवाय साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते. शहरी, ग्रामीण भागातील प्रश्नांना उढाण यांनी हात घातल्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर झाल्याचे मतमोजणीत दिसून आले. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये टोपे यांना मिळालेली लीड उढाण यांनी मोडीत काढली होती. त्यानंतर मात्र, शेवटच्या टप्प्यापर्यंत उढाण यांचीच आघाडी कायम होती. टोपे यांच्या अनेक समर्थकांनी पराभव ग्राह्य धरला होता. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये राजेश टोपे यांना मताधिक्य मिळाले.राजेश टोपे यांना जवळपास तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, अंतिम फेरीत काही मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी अभियंत्यांना पाचरण करण्यात आले होते. मात्र, अटी-तटीची लढत झालेल्या या मतदार संघातील निकालाकडे अवघ्या जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती.राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांना तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तांत्रिक बिघाड झालेल्या मतदान यंत्रातील मतदान १७०० च्या आसपास होते. त्यामुळे टोपे यांचा विजय निश्चित मानून समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सकाळी ८ वाजल्यापासून या मतदार संघात सुरू झालेली मतमोजणी ही कासव गतीनेच होती. मतमोजणी प्रक्रिया सर्वात संथ गतीने सुरू राहिल्याने उमेदवारांसह समर्थकांमध्येही तणावाचे वातावरण होते. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनीही याकडे लक्ष देऊन तो दूर करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा प्रशासनाने निकाल जाहीर करून टोपे यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले.अटी-तटीच्या झालेल्या निवडणुकीत अखेरच्या फेरीदरम्यान राजेश टोपे यांनी साधारणत: तीन हजारांहून अधिकचे मताधिक्य घेतले होते. ज्या मतदान यंत्रामध्ये बिघाड होता, त्यात मतदानाची संख्या कमी होती. त्यामुळे राजेश टोपे यांचा विजय निश्चित मानून समर्थकांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी टोपे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. अनेक फेºयांमध्ये उढाण हे पुढे असल्याने समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. मात्र, अखेरच्या फे-यांमध्ये टोपे यांनी बाजी मारली.टोपे यांना १०७८४९, हिकमत उढाण यांना १०४४४०, शेख हसनोद्दीन यांना १०७४, डॉ. अप्पासाहेब कदम यांना ५५५, अशोक आटोळे यांना ५९२, विष्णू शेळके यांना ९२९३, अमजद काजी यांना २५२, कल्याण चिमणे यांना ४७७, कैलास चोरमारे यांना ७२३ मते मिळाली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपे