शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चारही नगर पंचायतींच्या आगामी निवडणुका स्वतत्रंपणे लढविणार -राजाभाऊ देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

जिल्ह्यातील चारही नगर पंचायतींच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे लढवाव्यात, असा निर्णय जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोमवारी रोजी पार ...

जिल्ह्यातील चारही नगर पंचायतींच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे लढवाव्यात, असा निर्णय जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोमवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवस सोमवारी येथील भगवान सेवा मंगलकार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते.

याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, विजय कमड, संत्सग मुंढे, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, पक्षनिरीक्षक अ‍ॅड. अनंत वानखेडे, अशोक पडघन, जिल्हा कार्यध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद, प्रभाकर पवार, राम सांवत, एकबाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील बदनापूर, जाफराबाद, मंठा आणि घनसांवगी नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, अण्णासाहेब खंदारे, सुरेश गवळी, विष्णू कंटोले, लक्ष्मण म्हसलेकर, शेख अनवर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विमल आगलावे यांनी चारही नगर पंचायतींबद्दल आपल्या भाषणातून संपूर्ण माहिती देताना सांगितले की, काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी नगर पंचायतींच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात. जिल्ह्यात चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाची भरभक्कम स्थिती आहे आणि सामन्य कार्यकर्त्यांना उमेदावारी देताना न्यायाची भूमिका होईल. बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. पक्षाचे हे गौरवशाली वर्ष आहे, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आगामी नगर पंचायतीच्या निवडवणुका काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढवील, अशी घोषणा देशमुख यांनी केली. आ. राजेश राठोड बोलताना म्हणाले की, कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा गौरवशाली आणि बलिदानाचा इतिहास सातत्याने आपल्या स्मरणात ठेवल्यास काँग्रेस कार्यकर्ता हा कधीच निराश राहणार नाही. जिल्ह्यातील चारही नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असे राठोड यांनी सांगून मंठा नगर पंचायतीच्या १७ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रास्ताविक राख यांनी केले. या बैठकीत राजेश काळे, विठ्ठलसिंग राजपूत, आनंद लोखंडे, गुरुमित सिंग सेना, राजेद्र जैस्वाल, चंद्राताई भांगडीया, सुषमाताई पायगव्हाणे, मंगलताई खाडेभराड, चंदाकांत रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे, किसन जेठे, फकिरा वाघ, अशोक उबाळे, राजू पवार, संतोष अन्नदाते, भाऊसाहेब सोळुके, शरद देशमुख, मोबीन खान, शिवाजी वाघ, शिवराज जावध, वैभव उगले, सुरेश बोरुडे आदींची उपस्थिती होती. जहिरयार खान, जुनेद खान, जावेद कुरेशी, अनस चाऊस, शबाब कुरेशी, कयूम कुरेशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर काँग्रेस अध्यक्ष शेख मेहमूद यांनी केले, तर जिल्हा सरचिटणीस राम सांवत यांनी आभार मानले.