शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भोकरदन, जाफराबादवर अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:12 IST

जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या आठवडाभरात या दोन तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे. शनिवारी रात्री जालना ग्रामीण महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, यामुळे सामनगावसह अन्य गावामध्ये शेतक-यांच्या शेतात पाणी साचले आहे.जालना तालुक्यातील सामनगाव व परिसरात शनिवारी रात्री थेट १२१ मिलिमीटर पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसामुळे देवलाल डोंगरे यांची विहिर पूर्णपणे खचली असून, अनेकांच्या शेतात पाणी तुंबल्याने त्याचा निचरा न झाल्याने पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रविवारी रात्री जालना, बदनापूर, परतूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. भोकरदन शहर व परिसरात १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद असून, रविवारी रात्री बदनापूर तालुक्यात ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. अंबड तालुक्यातही रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने वडीगोद्री सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालना