शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पथकासमोर शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

फोटो बदनापूर : केंद्रीय पथकाने मंगळवारी दुसऱ्या दिवशी रोशनगाव, कस्तूरवाडी (ता. बदनापूर) शिवारात नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. ...

फोटो

बदनापूर : केंद्रीय पथकाने मंगळवारी दुसऱ्या दिवशी रोशनगाव, कस्तूरवाडी (ता. बदनापूर) शिवारात नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या.

तालुक्यात केंद्रीय पथकाने सोमवारी तीन गावशिवारांमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनी, पिके व अन्य बाबींची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता; परंतु मंगळवारी पुन्हा या पथकाने रोशनगाव, कस्तूरवाडी या शिवारात दौरा केला. यावेळी या पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यावेळी या शिवारातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे आमच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे चुकीचे झाल्याचा आरोप करून पिकविमा, अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे फेरपंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी या पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत विचारणा केली. या पथकाने सुखदेव हिवराळे यांच्या शेताची पाहणी केली, तसेच रोशनगाव-कस्तूरवाडी रोडवरील नाल्याचे पाणी शेतातून गेल्यामुळे शेत खरडून गेल्याचे सांगितले. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.