शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कार्यमुक्त १०५ कर्मचाऱ्यांचा प्रश्न आरोग्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त असलेल्या आणि कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना ...

जालना : कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त असलेल्या आणि कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना अचानक कार्यमुक्त करण्यात आले आहे. बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रिक्त जागांवरील नियुक्तीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत शुक्रवारी कोविड नर्सिंगच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे.

कोरोनाबाधितांना आप्तेष्टांनी दूर केले. परंतु, कोविड रूग्णालयात कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती मिळालेली असतानाही या १०५ कर्मचाऱ्यांनी सेवानिष्ठेने त्यांची सेवा केली. कोरोनाचे रूग्ण कमी झाले असले तरी त्याचा फैलाव जिल्ह्यात कायम आहे. परंतु, राष्ट्रीय अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक कार्यमुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोविड रूग्णालयात स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांवर नियुक्ती द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाने या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचित केले होते. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले.

पालकमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत हा विषय गेला होता. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व कोविड नर्सिंग कर्मचारी शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या शिष्टमंडळात सकारात्मक निर्णय झाला तरच या १०५ जणांवर उपासमारीची, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार नाही.

बैठकीतील चर्चेकडे कर्मचारी कुटुंबीयांचेही लक्ष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना बाधितांची एक दोन नव्हे तब्ब्ल १०५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा केली आहे. कोरोनासारख्या महामारीत प्रारंभी कोणी घराबाहेर पडत नव्हते. त्या काळात बाधितांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात या कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे शुक्रवारी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे संबंधित कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.