शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

दुभती जनावरे खरेदींचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:58 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी करण्याची ही योजना होती. मात्र २०१७ मध्ये सुरू झालेल्या योजनेला दोन वर्षानंतर का होईना मुहूर्त लागला आहे.

ठळक मुद्देदोन वर्षानंतर हालचाल : बंँकांकडून शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन, प्रकल्पाला मिळेल गती

जालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी करण्याची ही योजना होती. मात्र २०१७ मध्ये सुरू झालेल्या योजनेला दोन वर्षानंतर का होईना मुहूर्त लागला आहे.दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढकाराने दुभती जनावरे देण्याची ही योजना मराठवाडा पॅकेजमधून करण्यासाठीची योजना जाहीर केली होती. त्यात संबंधित शेतकºयाने एक गाय, एक म्हैस यासाठी अनुक्रमे दोन लाख १० हजार रूपये लागणार आहेत. या गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी एक खरेदी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने मंजूरी दिल्यावरच संबंधित शेतकºयाला हे ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के त्यांची स्वत:ची गुंतवणूक अशा प्रकारची ही योजना होती.मात्र मध्यंतरी या योजनेवरून बरेच राजकारण झाले. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. परंतु सध्या दुष्काळ असल्याने आणि शेकºयांकडे दुभती जनावरे खरेदीसाठी मुबलक पैसा नसल्याने त्या शेतकºयांना बँकांनी गाई- आणि म्हशीसाठी त्यांना साधारपणे दोन लाखाचे अर्थसाह्य करावे अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी बँक अधिकाºयांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा बँक मेळावा घेण्यात आला होता.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, मुख्याधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्याधिकारी मुकीम देशमुख, पंडित भुतेकर, संतोष मोहिते यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर, डॉ.एस.पी. गुडे, डॉ. अमितकुमार दुबे यांच्यासह अन्य अधिकाºयांची उपस्थिती होती.यावेळी शेतकºयांनी बँकेच्या अधिकाºयांना भेटण्यासाठी मोठी गर्दी सभागृहात केली होती.बंँकांनी सहकार्य करावेसध्या दुष्काळ असल्याने शेतकºयांसाठी ही योजना संजीवनी ठरू शकते. सध्या शेतकºयांकडे दुभती जनावरे खरेदीसाठी शिल्लक पैसा नसल्याने बँकांनी त्यांना कर्ज उपलब्घ करून द्यावे, त्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. एकूणच संपूर्ण जिल्ह्यासाठी ही योजना एक पथदर्शी ठरणार आहे असेही खोतकर यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्र