शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव; जालन्यातील मुख्य भाजीमंडीत ४० तर फेरीवाल्यांकडे ६० रुपये किलोचा दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST

जालना : जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपंधरवाड्यात भोपळ्यालाही मागणी वाढल्याने बाजारपेठेतील दर ४० ...

जालना : जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपंधरवाड्यात भोपळ्यालाही मागणी वाढल्याने बाजारपेठेतील दर ४० रुपये किलोवर गेले आहेत. तर फेरीवाल्यांकडून घरासमोर चक्क ६० रुपये किलोने भोपळा विक्री होत आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनालाही बसला आहे. परिणामी, बाजारपेठेत नियमित होणारी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. भाजीपाल्याची आवक मंदावल्याने बाजारपेठेतील दरही काही अंशी वाढले आहेत. तर घरासमोर भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले अधिकचा दर घेत आहेत.

व्यापारी काय म्हणतात?

सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची होणारी आवक मंदावली आहे. त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत. शिवाय ग्रामीण भागातून भाजीपाला आणून शहरी भागात विक्री करायचा म्हटले की वाहतुकीचा खर्च वाढतो. भाजीपाल्याच्या साठवणुकीसाठीही खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्हाला बाजारपेठेत काही प्रमाणात दर वाढवून भाजीपाल्याची विक्री करावी लागते.

- नितीन चव्हाण

भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठेतून किंवा ग्रामीण भागातून खरेदी करावी लागते. त्याची साठवणूक, वाहतूक यावरही व्यापाऱ्यांचा खर्च होतो. अतिवृष्टीचा परिणामही भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढले आहेत. फेरीवाले शहरातील विविध भागांत फिरून भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीसी दरवाढ होते.

- प्रकाश जईद

अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?

सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत जाऊन भाजीपाला खरेदी करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात पाऊस आला की मोठी गैरसोय होते. त्यामुळे बहुतांशवेळी आम्ही घरासमोर येणारा भाजीपाला खरेदी करण्यावर भर देतो. त्यामुळे भाजीपाला आणण्यासाठी बाजारपेठेत जाण्या- येण्याचा वेळ वाचतो शिवाय इतर त्रासही कमी होतो.

- दीपाली खवल

बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिक दराने भाजीपाला विक्री करतात. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात इंधनासह इतर साहित्याची दरवाढ होत असल्याने आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. असे असले तरी भाजीपाला खरेदी करावाच लागतो. ही बाब पाहता फेरीवाल्यांनी अधिकचा दर घेऊ नये.

- रागिणी राखे

मागणी वाढली....

सध्या पितृपंधरवाडा सुरू असून, या काळात भाजीपाल्याला अधिक मागणी वाढली आहे.

वाढलेली मागणी आणि बाजारपेठेतील घट यामुळे दरात वाढ होत आहे.

बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिकचा दर घेत असल्याचे दिसून येते.