शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव; जालन्यातील मुख्य भाजीमंडीत ४० तर फेरीवाल्यांकडे ६० रुपये किलोचा दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST

जालना : जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपंधरवाड्यात भोपळ्यालाही मागणी वाढल्याने बाजारपेठेतील दर ४० ...

जालना : जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपंधरवाड्यात भोपळ्यालाही मागणी वाढल्याने बाजारपेठेतील दर ४० रुपये किलोवर गेले आहेत. तर फेरीवाल्यांकडून घरासमोर चक्क ६० रुपये किलोने भोपळा विक्री होत आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनालाही बसला आहे. परिणामी, बाजारपेठेत नियमित होणारी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. भाजीपाल्याची आवक मंदावल्याने बाजारपेठेतील दरही काही अंशी वाढले आहेत. तर घरासमोर भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले अधिकचा दर घेत आहेत.

व्यापारी काय म्हणतात?

सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची होणारी आवक मंदावली आहे. त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत. शिवाय ग्रामीण भागातून भाजीपाला आणून शहरी भागात विक्री करायचा म्हटले की वाहतुकीचा खर्च वाढतो. भाजीपाल्याच्या साठवणुकीसाठीही खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्हाला बाजारपेठेत काही प्रमाणात दर वाढवून भाजीपाल्याची विक्री करावी लागते.

- नितीन चव्हाण

भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठेतून किंवा ग्रामीण भागातून खरेदी करावी लागते. त्याची साठवणूक, वाहतूक यावरही व्यापाऱ्यांचा खर्च होतो. अतिवृष्टीचा परिणामही भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढले आहेत. फेरीवाले शहरातील विविध भागांत फिरून भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीसी दरवाढ होते.

- प्रकाश जईद

अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?

सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत जाऊन भाजीपाला खरेदी करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात पाऊस आला की मोठी गैरसोय होते. त्यामुळे बहुतांशवेळी आम्ही घरासमोर येणारा भाजीपाला खरेदी करण्यावर भर देतो. त्यामुळे भाजीपाला आणण्यासाठी बाजारपेठेत जाण्या- येण्याचा वेळ वाचतो शिवाय इतर त्रासही कमी होतो.

- दीपाली खवल

बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिक दराने भाजीपाला विक्री करतात. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात इंधनासह इतर साहित्याची दरवाढ होत असल्याने आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. असे असले तरी भाजीपाला खरेदी करावाच लागतो. ही बाब पाहता फेरीवाल्यांनी अधिकचा दर घेऊ नये.

- रागिणी राखे

मागणी वाढली....

सध्या पितृपंधरवाडा सुरू असून, या काळात भाजीपाल्याला अधिक मागणी वाढली आहे.

वाढलेली मागणी आणि बाजारपेठेतील घट यामुळे दरात वाढ होत आहे.

बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिकचा दर घेत असल्याचे दिसून येते.