शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत; मनोज जरांगेंनी शासनाला दिली रात्रीपर्यंतची वेळ

By विजय मुंडे  | Updated: November 1, 2023 12:15 IST

दाेषींना सोडून शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना विनाकारण उचलू नका.

अंतरवाली सराटी (जि.जालना) : इंटरनेट बंद केल्याने हजारो युवकांनी रात्रभर इथं खडा पहारा दिला. इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. शासनाने आज रात्रीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी बुधवारी सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले शांततेचे आंदोलन आता मोठे झाले आहे. त्यामुळे ते आंदोलन दडपण्याचा शासनाचा डाव असू शकतो. मी इथून उठणार नाही आणि ते मला उठवू शकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दुसऱ्या वेळेस बैठक बोलाविली आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविणार की नाही, देणार तर किती दिवसात देणार ही भूमिका स्पष्ट करावी. शासनाने आज भूमिका स्पष्ट केली नाही तर रात्रीपासून पुन्हा पाणी पिणे बंद करणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

विनाकारण मुलांना उचलू नकाबीड, केजमध्ये शांततेत साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरू आहे. दाेषींना सोडून शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना विनाकारण उचलू नका. ज्यांना उचलले त्यांना सोडल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, तसे झाले नाही तर आपण बीडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक मुलांवर कसा अन्याय करतात ते पाहू असेही ते म्हणाले.

नितेश राणे यांनी बोलू नयेएकीकडे नितेश राणे मला फोन करून गोडगोड बोलतात तर तिकडे दुसरे बोलतात. आता त्यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही आणि नितेश राणे यांनीही इथून पुढे बोलू नये. माझा बोलाविता धनी कोण हे प्रसाद लाड यांना भेटल्यावर सांगतो, असेही जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण