शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

१० नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव ८ वर्षापासून लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:03 IST

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवीन १० पोलीस ठाण्यांसह एका चौकीच्या निर्मितीसाठी दाखल केलेले प्रस्ताव ८ वर्षांपासून शासकीय लाल फितीत अडकले आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्याची संख्या मात्र, तोकडी आहे. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवीन १० पोलीस ठाण्यांसह एका चौकीच्या निर्मितीसाठी दाखल केलेले प्रस्ताव ८ वर्षांपासून शासकीय लाल फितीत अडकले आहेत. १९ लाख ५८ हजार लोकसंख्येच्या जालना जिल्ह्यात केवळ १७५० च्या आसपास पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ११०० नागरिकांच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस कर्मचारी पाहावयास मिळत आहे.खून, दरोडा, चो-या, अपघात असोत किंवा मोर्चे, आंदोलने, निवडणुका, नेत्यांच्या सभा असोत सर्वत्र पोलीस बंदोबस्त लागतोच! सण-उत्सवाच्या काळातही पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. १९ लाख लोकसंख्येच्या जालना जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालय, चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह १८ पोलीस ठाण्यांतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पोलीस दलात जवळपास १८०० पोलीस अधिकारी, कर्मचा-यांची पदे मंजूर आहेत. पैकी जवळपास १७५० च्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. याच अधिकारी, कर्मचा-यांच्या खांद्यावर आंदोलने, मोर्चा, निवडणुका, मंत्र्यांच्या दौ-याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आहे. अपु-या संख्येमुळे पोलीस ठाण्यात दाखल होणाºया गुन्ह्यांची उकल करताना कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांच्या नाकी नऊ येत आहेत. वाढणारी लोकसंख्या आणि गुन्ह्याचे प्रमाण पाहता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २०११ पासून नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. २०११ मध्ये ६ तर २०१२ मध्ये ४ पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तर २०१३ मध्ये परतूर अंतर्गत सातोना पोलीस चौकीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.पोलीस दलाच्या वतीने नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. वेळोवेळी शासनाकडे अहवालही सादर केला जातो. मात्र, शासकीय पातळीवर मागील आठ वर्षांपासून नवीन १० पोलीस ठाणे निर्मितीच्या प्रस्तावाचे भिजत घोंगडे प्रशासकीय दरबारी पडून आहे. वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारी पाहता नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळणे गरजेचे आहे.असे आहेत नवीन ठाण्यांचे प्रस्तावजिल्हा पोलीस दलाच्या वतीने दहा नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल करण्यात आले आहेत.यात २०११ मध्ये एमआयडीसी पोलीस ठाणे, मार्केट यार्ड, कादराबाद, तीर्थपुरी, शहागड, राजूर येथे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती व्हावी, यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले.तर २०१२ मध्ये वाटूर, वाघ्रूळ, अंबड ग्रामीण, कुंभार पिंपळगाव येथे नवीन पोलीस ठाणे व्हावे म्हणून प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना