शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘वटेश्वर’ची ४० लाखांची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

दीपक ढोले जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या ...

दीपक ढोले

जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची ४० लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.

जालना येथील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने नागरिकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत २०१७ साली कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. फसवणूक झालेल्या सर्व लोकांना बोलवून विचारपूस केली. १ लाख रूपये घेऊन प्रत्येक महिन्याला १२ हजार रूपये देण्याचे आमिष वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने दाखविले असल्याचे यात निष्पन्न झाले. ३८ लाेकांची १ करोड २३ लाख रूपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले.

त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मालमत्तांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ४० लाख रूपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच याचा प्रस्ताव तयार करून मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संचालक मंडळाची आणखीही मालमत्ता असून, आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने त्याची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. याची चौकशी सउपपोनि. रवी जोशी, फुलसिंग घुसिंगे, मंगल लोणकर, रवी गायकवाड, निमा घनघाव, ज्ञानेश्वर खराडे आदी करत आहे.

जालना शहरातील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने ३८ लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. सोसायटीची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा आहे.

शालिनी नाईक, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

आर्थिक गुन्हे शाखेने केलेला प्रस्ताव बरोबर आहे की नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या प्रस्तावाची तपासणी केली जाते. यासाठी उपविभागीय अधिकारी, जालना व उपविभागीय अधिकारी, अंबड यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.