शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘वटेश्वर’ची ४० लाखांची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

दीपक ढोले जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या ...

दीपक ढोले

जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची ४० लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.

जालना येथील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने नागरिकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत २०१७ साली कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. फसवणूक झालेल्या सर्व लोकांना बोलवून विचारपूस केली. १ लाख रूपये घेऊन प्रत्येक महिन्याला १२ हजार रूपये देण्याचे आमिष वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने दाखविले असल्याचे यात निष्पन्न झाले. ३८ लाेकांची १ करोड २३ लाख रूपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले.

त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मालमत्तांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ४० लाख रूपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच याचा प्रस्ताव तयार करून मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संचालक मंडळाची आणखीही मालमत्ता असून, आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने त्याची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. याची चौकशी सउपपोनि. रवी जोशी, फुलसिंग घुसिंगे, मंगल लोणकर, रवी गायकवाड, निमा घनघाव, ज्ञानेश्वर खराडे आदी करत आहे.

जालना शहरातील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने ३८ लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. सोसायटीची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा आहे.

शालिनी नाईक, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

आर्थिक गुन्हे शाखेने केलेला प्रस्ताव बरोबर आहे की नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या प्रस्तावाची तपासणी केली जाते. यासाठी उपविभागीय अधिकारी, जालना व उपविभागीय अधिकारी, अंबड यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.