शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

‘वटेश्वर’ची ४० लाखांची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

दीपक ढोले जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या ...

दीपक ढोले

जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची ४० लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.

जालना येथील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने नागरिकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत २०१७ साली कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. फसवणूक झालेल्या सर्व लोकांना बोलवून विचारपूस केली. १ लाख रूपये घेऊन प्रत्येक महिन्याला १२ हजार रूपये देण्याचे आमिष वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने दाखविले असल्याचे यात निष्पन्न झाले. ३८ लाेकांची १ करोड २३ लाख रूपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले.

त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मालमत्तांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ४० लाख रूपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच याचा प्रस्ताव तयार करून मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संचालक मंडळाची आणखीही मालमत्ता असून, आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने त्याची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. याची चौकशी सउपपोनि. रवी जोशी, फुलसिंग घुसिंगे, मंगल लोणकर, रवी गायकवाड, निमा घनघाव, ज्ञानेश्वर खराडे आदी करत आहे.

जालना शहरातील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने ३८ लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. सोसायटीची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा आहे.

शालिनी नाईक, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

आर्थिक गुन्हे शाखेने केलेला प्रस्ताव बरोबर आहे की नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या प्रस्तावाची तपासणी केली जाते. यासाठी उपविभागीय अधिकारी, जालना व उपविभागीय अधिकारी, अंबड यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.