शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

खत वाटपाला येणार अडचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:37 IST

सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.खतांचा काळा बाजार रोखला जावा, अनुदानित खते ज्या विभागासाठी मंजूर आहेत, त्याच भागातील योग्य लाभार्थ्यांना विकली जातात का ? याची आॅनलाइन नोंद घेता यावी आदी कारणांमुळे राज्यशासनाने मागील वर्षापासून सर्व प्रकारची खते ई-पॉस मशीनद्वारे विक्री करणे बंधनकारक केले आहे. खते खरेदीसाठी जाताना शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत घेवून जाणे गरजेचे आहे. जालना शहर व तालुका पातळीवर, तसेच बाजार गावांमध्ये मिळून जिल्ह्यात सुमारे १२०० कृषिसेवा केंदे्र आहेत.यातील जवळपासून ६४० कृषिकेंद्र चालकांना ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित कृषिसेवा केंद्र चालकांकडे मशीनच उपलब्ध नाही. जिल्ह्याला मागील वर्षी प्राप्त झालेल्या कृषीकेंद्र चालकांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अन्य जिल्ह्याला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक लाख ८३ हजार २२६ मेट्रिक टन खताचे आवंटन मजूर आहे. त्यातील एक लाख ६६ हजार २८० मेट्रिक टन जिल्ह्यास उपलब्ध झाले आहे. या पैकी गेल्या आवठवड्यात ४६ हजार ६०२ मेट्रिन टन बाजारपेठेत दाखल झाले आहे. ई-पास मशीनअभावी खत वाटपास अडचणी येत आहेत. शिवार दिलेल्या वेळेत खतांची विक्री न केल्यास कृषिसेवा केंद्र चालकांच्या अडचणीत भर पडणार आहे.कृषिकेंद्राना परवाने देण्याचे अधिकारी आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास आहे. त्यामुळे कृषीसेवा केंद्राची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यास आवश्यक ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी दिल्या आहेत.ऐन खरिपाच्या तोंडावर सहाशेंवर कृषिकेंद्र चालकांकडे ई-पॉस मशीन नसल्यामुळे त्यांना शेतकºयांना खत विक्री करताना अडचण येणार आहे. शिवाय खताची वेळेत विक्री न झाल्यास विक्रेत्यांकडील खत तसेच पडून राहिल्यास त्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय शेतकºयांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी सहाशेंवर मशीन उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाला कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्र