शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

खत वाटपाला येणार अडचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:37 IST

सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.खतांचा काळा बाजार रोखला जावा, अनुदानित खते ज्या विभागासाठी मंजूर आहेत, त्याच भागातील योग्य लाभार्थ्यांना विकली जातात का ? याची आॅनलाइन नोंद घेता यावी आदी कारणांमुळे राज्यशासनाने मागील वर्षापासून सर्व प्रकारची खते ई-पॉस मशीनद्वारे विक्री करणे बंधनकारक केले आहे. खते खरेदीसाठी जाताना शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत घेवून जाणे गरजेचे आहे. जालना शहर व तालुका पातळीवर, तसेच बाजार गावांमध्ये मिळून जिल्ह्यात सुमारे १२०० कृषिसेवा केंदे्र आहेत.यातील जवळपासून ६४० कृषिकेंद्र चालकांना ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित कृषिसेवा केंद्र चालकांकडे मशीनच उपलब्ध नाही. जिल्ह्याला मागील वर्षी प्राप्त झालेल्या कृषीकेंद्र चालकांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अन्य जिल्ह्याला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक लाख ८३ हजार २२६ मेट्रिक टन खताचे आवंटन मजूर आहे. त्यातील एक लाख ६६ हजार २८० मेट्रिक टन जिल्ह्यास उपलब्ध झाले आहे. या पैकी गेल्या आवठवड्यात ४६ हजार ६०२ मेट्रिन टन बाजारपेठेत दाखल झाले आहे. ई-पास मशीनअभावी खत वाटपास अडचणी येत आहेत. शिवार दिलेल्या वेळेत खतांची विक्री न केल्यास कृषिसेवा केंद्र चालकांच्या अडचणीत भर पडणार आहे.कृषिकेंद्राना परवाने देण्याचे अधिकारी आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास आहे. त्यामुळे कृषीसेवा केंद्राची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यास आवश्यक ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी दिल्या आहेत.ऐन खरिपाच्या तोंडावर सहाशेंवर कृषिकेंद्र चालकांकडे ई-पॉस मशीन नसल्यामुळे त्यांना शेतकºयांना खत विक्री करताना अडचण येणार आहे. शिवाय खताची वेळेत विक्री न झाल्यास विक्रेत्यांकडील खत तसेच पडून राहिल्यास त्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय शेतकºयांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी सहाशेंवर मशीन उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाला कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्र