शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

१५ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

By admin | Updated: October 12, 2016 23:55 IST

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे.

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे चांधई एक्को व बाणेगांव येथील मध्यम प्रकल्प तहानलेलेच होते. या दोन्ही प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, चांधई एक्को, चांधई टेपली, बाणेगांव, खामखेडा, थिगळखेडा, चांधई ठोंबरी, चिंचोली निपाणी, लोणगांव, जावळेवाडी आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो. पावसाअभावी धरण कोरडे असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. तसेच शेतकऱ्यांना रबीचा हंगाम साधता आला नव्हता. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरण भरण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाल्याने आसपासच्या ग्रामस्थांची पाणी समस्या मिटली आहे. सध्या बाणेगाव प्रकल्पाचे पाणी जालना भोकरदन मुख्यरस्त्याला लागले आहे.या प्रकल्पाची अजून दीड मीटर भिंंतीचे काम बाकी आहे. मात्र बाणगंगा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात न आल्याने अद्याप भिंतीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असते, तर मुख्यरस्ता पाण्याखाली गेला असता अशी परिस्थीती सध्या निर्माण झालेली आहे. अंदाजपत्रकात भोकरदन रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची तरतूद केलेली असताना काम कोणत्या कारणामुळे रखडले, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमधून केली जात आहे. (वार्ताहर)