शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

१५ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

By admin | Updated: October 12, 2016 23:55 IST

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे.

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे चांधई एक्को व बाणेगांव येथील मध्यम प्रकल्प तहानलेलेच होते. या दोन्ही प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, चांधई एक्को, चांधई टेपली, बाणेगांव, खामखेडा, थिगळखेडा, चांधई ठोंबरी, चिंचोली निपाणी, लोणगांव, जावळेवाडी आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो. पावसाअभावी धरण कोरडे असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. तसेच शेतकऱ्यांना रबीचा हंगाम साधता आला नव्हता. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरण भरण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाल्याने आसपासच्या ग्रामस्थांची पाणी समस्या मिटली आहे. सध्या बाणेगाव प्रकल्पाचे पाणी जालना भोकरदन मुख्यरस्त्याला लागले आहे.या प्रकल्पाची अजून दीड मीटर भिंंतीचे काम बाकी आहे. मात्र बाणगंगा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात न आल्याने अद्याप भिंतीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असते, तर मुख्यरस्ता पाण्याखाली गेला असता अशी परिस्थीती सध्या निर्माण झालेली आहे. अंदाजपत्रकात भोकरदन रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची तरतूद केलेली असताना काम कोणत्या कारणामुळे रखडले, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमधून केली जात आहे. (वार्ताहर)