शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

By admin | Updated: October 12, 2016 23:55 IST

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे.

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे चांधई एक्को व बाणेगांव येथील मध्यम प्रकल्प तहानलेलेच होते. या दोन्ही प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, चांधई एक्को, चांधई टेपली, बाणेगांव, खामखेडा, थिगळखेडा, चांधई ठोंबरी, चिंचोली निपाणी, लोणगांव, जावळेवाडी आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो. पावसाअभावी धरण कोरडे असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. तसेच शेतकऱ्यांना रबीचा हंगाम साधता आला नव्हता. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरण भरण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाल्याने आसपासच्या ग्रामस्थांची पाणी समस्या मिटली आहे. सध्या बाणेगाव प्रकल्पाचे पाणी जालना भोकरदन मुख्यरस्त्याला लागले आहे.या प्रकल्पाची अजून दीड मीटर भिंंतीचे काम बाकी आहे. मात्र बाणगंगा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात न आल्याने अद्याप भिंतीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असते, तर मुख्यरस्ता पाण्याखाली गेला असता अशी परिस्थीती सध्या निर्माण झालेली आहे. अंदाजपत्रकात भोकरदन रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची तरतूद केलेली असताना काम कोणत्या कारणामुळे रखडले, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमधून केली जात आहे. (वार्ताहर)