शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

By admin | Updated: October 12, 2016 23:55 IST

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे.

राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे चांधई एक्को व बाणेगांव येथील मध्यम प्रकल्प तहानलेलेच होते. या दोन्ही प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, चांधई एक्को, चांधई टेपली, बाणेगांव, खामखेडा, थिगळखेडा, चांधई ठोंबरी, चिंचोली निपाणी, लोणगांव, जावळेवाडी आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो. पावसाअभावी धरण कोरडे असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. तसेच शेतकऱ्यांना रबीचा हंगाम साधता आला नव्हता. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरण भरण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाल्याने आसपासच्या ग्रामस्थांची पाणी समस्या मिटली आहे. सध्या बाणेगाव प्रकल्पाचे पाणी जालना भोकरदन मुख्यरस्त्याला लागले आहे.या प्रकल्पाची अजून दीड मीटर भिंंतीचे काम बाकी आहे. मात्र बाणगंगा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात न आल्याने अद्याप भिंतीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असते, तर मुख्यरस्ता पाण्याखाली गेला असता अशी परिस्थीती सध्या निर्माण झालेली आहे. अंदाजपत्रकात भोकरदन रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची तरतूद केलेली असताना काम कोणत्या कारणामुळे रखडले, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमधून केली जात आहे. (वार्ताहर)