शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारातील डाळींमधील तेजी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:29 IST

बाजारगप्पा :  बाजारपेठेत ग्राहकी नसली तरी तुरीची आवक वाढली असून, तुरीच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. 

- संजय देशमुख (जालना)

गेल्या महिनाभरामध्ये डाळींमध्ये आलेली तेजी आता हळूहळू कमी होत असून, हरभरा आणि तूर डाळीत क्विंटलमागे अनुक्रमे ४०० आणि २०० रुपयांची घट झाली आहे. एकूणच बाजारपेठेत ग्राहकी नसली तरी तुरीची आवक वाढली असून, तुरीच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. 

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूणच दुष्काळाची परिस्थिती तीव्रपणे जाणवत आहे. ज्वारी (२०० पोती आवक असून, भाव २५०० ते ३२००) मध्ये ३०० रुपयांनी क्विंटलमागे भाव कमी झाले आहेत. बाजरीची बाजारपेठेत आवक ३०० पोती असून, १३०० ते २१०० रुपये असे भाव क्विंटलमागे मिळत असून, यात १०० रुपयांची घट झाली आहे. जालना येथील मोंढ्यात मक्याची आवक कायम असून, ३ हजार पोती मका येत असून, त्याच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या १५०० ते १६५० रुपये क्विंटलने खरेदी होत आहे. नवीन तूर बऱ्यापैकी येत असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक नगण्य आहे. सध्या तुरीचे भाव ४५०० ते ५३०० रुपये असून, यात १०० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनची आवक ५०० पोती असून, ३३०० रुपयांचा भाव कायम आहे. नवीन हरभरादेखील बाजारपेठेत दाखल होत असून, दररोज ५०० पोती आवक आहे. त्याचे भाव ३८०० ते ४४०० आहेत. गुळाची आवकही जालना बाजारपेठेत चांगली असून, दररोज ३००० भेली येत आहेत. त्याचे भाव सरासरी ३१०० रुपये एवढे आहेत. गावरान गुळाला मोठी मागणी असून, त्याचे दरही दररोज वाढत आहेत.हरभरा डाळीचे भाव सध्या ५६०० ते ५७०० रुपये क्विंटल आहेत. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४०० रुपयांची घट झाली आहे. तूर डाळीचे भाव ६१०० ते ६२०० रुपये क्विंटल असून, यामध्येही २०० रुपयांची घट झाली आहे. मूग डाळीचे भाव ७२०० रुपये क्विंटल आहेत. मसूर डाळीतही घट झाली असून, सध्या ४८०० क्विंटलने विक्री होत आहे. साखरेसंदर्भात सरकारचे धोरण निश्चित नाही. साखरेच्या दरात ५० रुपयांची क्विंटलमागे घट झाली आहे. अनेक साखर कारखाने एफआरपीच्या मुद्यावरून अडचणीत आल्याने मिळेल त्या भावात साखर गोदामाबाहेर काढत आहेत. साखरेचा हमीभाव हा २९०० रुपये ठरवून दिला आहे. भुसार मालाच्या उलाढालीसोबतच मोंढ्यात सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू  केले असले तरी गेल्या १५ दिवसांमध्ये या केंद्रावर केवळ २००० क्विंटल एवढा अत्यल्प कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला आहे. नाफेडने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर अद्याप प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली नाही. सध्या कुठलाच मोठा सण नसल्याने बाजारपेठेत निरुत्साही वातावरण आहे. किराणा मालामध्ये पाहिजे तशी तेजी नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तेल, तुपाच्या दरातही पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. पोहे, मुरमुरे, रवा आदींच्या कि मतीही स्थिर होत्या. नारळाच्या भावातही घट झाली असून, ६० नारळांच्या पोत्याचे दर ७०० रुपये आहे. यात १०० रुपयांची घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार