शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जालना बाजारातील डाळींमधील तेजी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:29 IST

बाजारगप्पा :  बाजारपेठेत ग्राहकी नसली तरी तुरीची आवक वाढली असून, तुरीच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. 

- संजय देशमुख (जालना)

गेल्या महिनाभरामध्ये डाळींमध्ये आलेली तेजी आता हळूहळू कमी होत असून, हरभरा आणि तूर डाळीत क्विंटलमागे अनुक्रमे ४०० आणि २०० रुपयांची घट झाली आहे. एकूणच बाजारपेठेत ग्राहकी नसली तरी तुरीची आवक वाढली असून, तुरीच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. 

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूणच दुष्काळाची परिस्थिती तीव्रपणे जाणवत आहे. ज्वारी (२०० पोती आवक असून, भाव २५०० ते ३२००) मध्ये ३०० रुपयांनी क्विंटलमागे भाव कमी झाले आहेत. बाजरीची बाजारपेठेत आवक ३०० पोती असून, १३०० ते २१०० रुपये असे भाव क्विंटलमागे मिळत असून, यात १०० रुपयांची घट झाली आहे. जालना येथील मोंढ्यात मक्याची आवक कायम असून, ३ हजार पोती मका येत असून, त्याच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या १५०० ते १६५० रुपये क्विंटलने खरेदी होत आहे. नवीन तूर बऱ्यापैकी येत असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक नगण्य आहे. सध्या तुरीचे भाव ४५०० ते ५३०० रुपये असून, यात १०० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनची आवक ५०० पोती असून, ३३०० रुपयांचा भाव कायम आहे. नवीन हरभरादेखील बाजारपेठेत दाखल होत असून, दररोज ५०० पोती आवक आहे. त्याचे भाव ३८०० ते ४४०० आहेत. गुळाची आवकही जालना बाजारपेठेत चांगली असून, दररोज ३००० भेली येत आहेत. त्याचे भाव सरासरी ३१०० रुपये एवढे आहेत. गावरान गुळाला मोठी मागणी असून, त्याचे दरही दररोज वाढत आहेत.हरभरा डाळीचे भाव सध्या ५६०० ते ५७०० रुपये क्विंटल आहेत. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४०० रुपयांची घट झाली आहे. तूर डाळीचे भाव ६१०० ते ६२०० रुपये क्विंटल असून, यामध्येही २०० रुपयांची घट झाली आहे. मूग डाळीचे भाव ७२०० रुपये क्विंटल आहेत. मसूर डाळीतही घट झाली असून, सध्या ४८०० क्विंटलने विक्री होत आहे. साखरेसंदर्भात सरकारचे धोरण निश्चित नाही. साखरेच्या दरात ५० रुपयांची क्विंटलमागे घट झाली आहे. अनेक साखर कारखाने एफआरपीच्या मुद्यावरून अडचणीत आल्याने मिळेल त्या भावात साखर गोदामाबाहेर काढत आहेत. साखरेचा हमीभाव हा २९०० रुपये ठरवून दिला आहे. भुसार मालाच्या उलाढालीसोबतच मोंढ्यात सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू  केले असले तरी गेल्या १५ दिवसांमध्ये या केंद्रावर केवळ २००० क्विंटल एवढा अत्यल्प कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला आहे. नाफेडने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर अद्याप प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली नाही. सध्या कुठलाच मोठा सण नसल्याने बाजारपेठेत निरुत्साही वातावरण आहे. किराणा मालामध्ये पाहिजे तशी तेजी नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तेल, तुपाच्या दरातही पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. पोहे, मुरमुरे, रवा आदींच्या कि मतीही स्थिर होत्या. नारळाच्या भावातही घट झाली असून, ६० नारळांच्या पोत्याचे दर ७०० रुपये आहे. यात १०० रुपयांची घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार