शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

भूसंपादनासाठी दबाव तंत्राची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:44 IST

जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे.

बाबासाहेब महस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. थेट खरेदीने जमीन न दिल्यास भूसंपादन कायद्यानुसार जमीन घेण्यात येईल, असे शेतक-यांना सांगितले जात आहे.राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नियम व अटींमध्ये वारंवार बदल केला जात आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आजही संयुक्त मोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासह महामंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शिबीर कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा बाधित शेतक-यांचा आरोप आहे. जालना तालुक्यातील १५ गावांमधील ३६४ खरेदीखतांच्या माध्यमातून आतापर्यंत १७२.५९ तर बदनापूर तालुक्यातील १० गावांमधील २६८ खरेदीखतांच्या माध्यमातून ११८ हेक्टर जमिनीची खरेदी पूर्ण झाली आहे. दोन्ही तालुक्यात शासकीय व खाजगी मिळवून आतापर्यंत ३६६.६२ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत १४४ हेक्टर जमिनीचे संपादन अद्याप बाकी आहे. यातील काही शेतकºयांच्या जमिनीचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. तर मोजणीतील त्रुटी आणि वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतक-यांनी जमिनीचे खरेदीखत अद्याप पूर्ण केलेले नाही. जिल्ह्यात आता केवळ २७ टक्के भूसंपादन बाकी असल्याने राज्यशासनाने ही जमीन भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसा अध्यादेशही शासनाने काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तो अद्याप जिल्हास्तरावर पोहचलेला नाही. भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने जमीन संपादन केल्यास शेतक-यांवरील दबाव वाढणार आहे. अप्रत्यक्षरीत्या दोन्ही तालुक्यातील शेतक-यांना तशी माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाने जाहीर केलेल्या मोबदल्यातच शेतकºयांनी आपल्या जमिनी लवकर महामार्गास द्याव्यात, त्यासाठी हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे खादगाव येथील एका शेतक-यांने सांगितले. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे सुरू करण्याची घाई झाल्याने राज्यशासन शक्य जमीन संपादनासाठी शक्य त्या मार्गांचा वापर करताना दिसत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी