शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

भूसंपादनासाठी दबाव तंत्राची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:44 IST

जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे.

बाबासाहेब महस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. थेट खरेदीने जमीन न दिल्यास भूसंपादन कायद्यानुसार जमीन घेण्यात येईल, असे शेतक-यांना सांगितले जात आहे.राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नियम व अटींमध्ये वारंवार बदल केला जात आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आजही संयुक्त मोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासह महामंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शिबीर कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा बाधित शेतक-यांचा आरोप आहे. जालना तालुक्यातील १५ गावांमधील ३६४ खरेदीखतांच्या माध्यमातून आतापर्यंत १७२.५९ तर बदनापूर तालुक्यातील १० गावांमधील २६८ खरेदीखतांच्या माध्यमातून ११८ हेक्टर जमिनीची खरेदी पूर्ण झाली आहे. दोन्ही तालुक्यात शासकीय व खाजगी मिळवून आतापर्यंत ३६६.६२ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत १४४ हेक्टर जमिनीचे संपादन अद्याप बाकी आहे. यातील काही शेतकºयांच्या जमिनीचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. तर मोजणीतील त्रुटी आणि वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतक-यांनी जमिनीचे खरेदीखत अद्याप पूर्ण केलेले नाही. जिल्ह्यात आता केवळ २७ टक्के भूसंपादन बाकी असल्याने राज्यशासनाने ही जमीन भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसा अध्यादेशही शासनाने काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तो अद्याप जिल्हास्तरावर पोहचलेला नाही. भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने जमीन संपादन केल्यास शेतक-यांवरील दबाव वाढणार आहे. अप्रत्यक्षरीत्या दोन्ही तालुक्यातील शेतक-यांना तशी माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाने जाहीर केलेल्या मोबदल्यातच शेतकºयांनी आपल्या जमिनी लवकर महामार्गास द्याव्यात, त्यासाठी हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे खादगाव येथील एका शेतक-यांने सांगितले. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे सुरू करण्याची घाई झाल्याने राज्यशासन शक्य जमीन संपादनासाठी शक्य त्या मार्गांचा वापर करताना दिसत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी