शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी दबाव तंत्राची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:44 IST

जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे.

बाबासाहेब महस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना व बदनापूर तालुक्यातून सुमारे ४३ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळ शेतकºयांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. थेट खरेदीने जमीन न दिल्यास भूसंपादन कायद्यानुसार जमीन घेण्यात येईल, असे शेतक-यांना सांगितले जात आहे.राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नियम व अटींमध्ये वारंवार बदल केला जात आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आजही संयुक्त मोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासह महामंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शिबीर कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा बाधित शेतक-यांचा आरोप आहे. जालना तालुक्यातील १५ गावांमधील ३६४ खरेदीखतांच्या माध्यमातून आतापर्यंत १७२.५९ तर बदनापूर तालुक्यातील १० गावांमधील २६८ खरेदीखतांच्या माध्यमातून ११८ हेक्टर जमिनीची खरेदी पूर्ण झाली आहे. दोन्ही तालुक्यात शासकीय व खाजगी मिळवून आतापर्यंत ३६६.६२ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत १४४ हेक्टर जमिनीचे संपादन अद्याप बाकी आहे. यातील काही शेतकºयांच्या जमिनीचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. तर मोजणीतील त्रुटी आणि वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतक-यांनी जमिनीचे खरेदीखत अद्याप पूर्ण केलेले नाही. जिल्ह्यात आता केवळ २७ टक्के भूसंपादन बाकी असल्याने राज्यशासनाने ही जमीन भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसा अध्यादेशही शासनाने काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तो अद्याप जिल्हास्तरावर पोहचलेला नाही. भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने जमीन संपादन केल्यास शेतक-यांवरील दबाव वाढणार आहे. अप्रत्यक्षरीत्या दोन्ही तालुक्यातील शेतक-यांना तशी माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाने जाहीर केलेल्या मोबदल्यातच शेतकºयांनी आपल्या जमिनी लवकर महामार्गास द्याव्यात, त्यासाठी हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे खादगाव येथील एका शेतक-यांने सांगितले. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे सुरू करण्याची घाई झाल्याने राज्यशासन शक्य जमीन संपादनासाठी शक्य त्या मार्गांचा वापर करताना दिसत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी