शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींचे अंदाज पत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी समाजकल्याणकडे सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

१२४५ विहिरींची वीज जोडणी रखडली ; जिल्हाधिका-यांच्या सूचना, महावितरण व कृषी विभागाची घेतली बैठक जालना : डॉ. बाबासाहेब ...

१२४५ विहिरींची वीज जोडणी रखडली ; जिल्हाधिका-यांच्या सूचना, महावितरण व कृषी विभागाची घेतली बैठक

जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थींची निवड करून तीन वर्षांत १२४५ विहिरी खोदल्या आहेत. यातील काही ठिकाणी मुबलक तर काहींना गरजेपुरते पाणी लागले. मात्र, वीज जोडणीअभावी हेच पाणी उपसून पिकांना देता येत नसल्याने शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नुकतीच महावितरण व कृषी विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली आहे. यावेळी विहिरींचे अंदाज पत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी महावितरणच्या अधिका-यांना दिल्या आहेत.

या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हाधिकारी केशव नेटके, महावितरणचे कार्यकारी अभियंता राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह समाजकल्याणच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकºयांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात वर्ष २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० मध्ये १२४५ लाभार्थींची निवड करून त्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला. तीन ते सव्वातीन लाखांचे हे पॅकेज होते. यात विहीर खोदणे, बांधकाम करणे, वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक व तुषारची सुविधा आदींचा समावेश होता. आता शासनाने विहिरीची योजना आणल्यामुळे आपल्याही शेताला पाणी मिळेल, पिके बहरतील, फळबाग लावता येईल व घर- कुटुंबाचे जीवनमानही उंचावेल अशी स्वप्ने हे शेतकरी पाहत होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शेतकºयांनी शासनाकडून अनुदान घेतले, यासोबतच बचत म्हणून ठेवलेले काही पैसे त्यात टाकून विहिरी खोदल्या, बांधकाम केले, काहींनी पाईपलाईनही केली. मात्र, मागील तीन वर्षापासून शेतकºयांना वीज जोडणी मिळाली नसल्याने पाणी उपसून पिकांना देता येत नाही. याबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेऊन महावितरणला तातडीने विहिरींना वीज जोडणी देण्याचे आदेश दिले होते. परंतु, याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाºयांनी नुकतीच बैठक घेऊन अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत.

६ कोटी रूपयांचा निधी मंजूर

१२४५ विहिरींना वीज जोडणीसाठी जवळपास १२ ते १३ कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. परंतु, समाजकल्याण विभागाकडे निधीच नसल्याने सदरील विहिरींची वीज जोडणी रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. काही दिवसांपूर्वीच समाजकल्याणकडे ६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यासाठी महावितरणने तातडीने विहिरींचे अंदाज पत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी समाजकल्याणकडे सादर करावे, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. यात केवळ १०० ते १५० विहिरींनाच वीज जोडणी मिळणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना - ११९६

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना -७

राष्ट्रीय कृषी विकास योजना- ४२