शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप ...

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता यामुळे सर्वांचाच ऊस जाईल याची शाश्वती देता येत नसल्याची खंत मॉ बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी लाेकमतशी बोलताना व्यक्त केली.

मॉ बागेश्वरी साखर कारखान्याने आतापर्यंत ३ हजार हेक्टरवरील ऊस आणून ३ लाख क्विंटल साखरेचे गाळप केल्याच्या पार्श्वभूमीवर चेअरमन शिवाजीरव जाधव बोलत होते. पुढे ते म्हणाले, उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता याचा विचार करता कारखाना मेपर्यंत चालवूनही दीड लाख मे. टन ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे. बागेश्वरीची गाळप क्षमता २ हजार ५०० मे. टन होती, ती आपण शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ही क्षमता ३ हजार ४०० मे. टन केली आहे. आतापर्यंत ३ लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. अद्याप ५ लाख मे. टन ऊस उभा आहे. काराखान्याकडे नोंद नसलेला व बाहेर देण्यात आलेल्या ७५ हजार मे. टन उसाचा प्रश्न वेगळाचा आहे. डिसेंबरमधील ऊस मार्चमध्ये जात आहे. मे अखेरपर्यंत कारखाना सुरू राहिला तरी ५ लाख मे. टनापैकी ३.५ लाख मे. टनच उसाचे कारखाना गाळप करू शकतो. म्हणजे १.५ लाख मे. टन उसाचा प्रश्न अंधातरीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे नोंदणी केल्याशिवाय नवीन उसाची लागवड करू नये, असेही शेवटी शिवाजीराव जाधव म्हणाले. या वेळी के. आर. निर्वळ, सरपंच मधुकर झरेकर, संतोष दिंडे आदी उपस्थित होते.

....

जालना जिल्ह्यात ६ लाख मे. टन अतिरिक्त ऊस

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मार्चनंतर काही ऊस बळीराजा साखर कारखाना पूर्णाकडे पाठवण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. पूर्ण जिल्हाभरात ५ ते ६ लाख मे. टन ऊस अतिरिक्त आहे. अधिकच्या उसाचा प्रश्न शासनाला कळविण्यात येईल, कारण सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झाले पाहिजे, मात्र उसाचे सातत वाढत जाणारे क्षेत्र व काराखान्याची मर्यादित गाळप क्षमता, यामुळे अडचण आहे.

.............

फोटो. पान ४ शिवाजीराव जाधव