शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप ...

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता यामुळे सर्वांचाच ऊस जाईल याची शाश्वती देता येत नसल्याची खंत मॉ बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी लाेकमतशी बोलताना व्यक्त केली.

मॉ बागेश्वरी साखर कारखान्याने आतापर्यंत ३ हजार हेक्टरवरील ऊस आणून ३ लाख क्विंटल साखरेचे गाळप केल्याच्या पार्श्वभूमीवर चेअरमन शिवाजीरव जाधव बोलत होते. पुढे ते म्हणाले, उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता याचा विचार करता कारखाना मेपर्यंत चालवूनही दीड लाख मे. टन ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे. बागेश्वरीची गाळप क्षमता २ हजार ५०० मे. टन होती, ती आपण शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ही क्षमता ३ हजार ४०० मे. टन केली आहे. आतापर्यंत ३ लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. अद्याप ५ लाख मे. टन ऊस उभा आहे. काराखान्याकडे नोंद नसलेला व बाहेर देण्यात आलेल्या ७५ हजार मे. टन उसाचा प्रश्न वेगळाचा आहे. डिसेंबरमधील ऊस मार्चमध्ये जात आहे. मे अखेरपर्यंत कारखाना सुरू राहिला तरी ५ लाख मे. टनापैकी ३.५ लाख मे. टनच उसाचे कारखाना गाळप करू शकतो. म्हणजे १.५ लाख मे. टन उसाचा प्रश्न अंधातरीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे नोंदणी केल्याशिवाय नवीन उसाची लागवड करू नये, असेही शेवटी शिवाजीराव जाधव म्हणाले. या वेळी के. आर. निर्वळ, सरपंच मधुकर झरेकर, संतोष दिंडे आदी उपस्थित होते.

....

जालना जिल्ह्यात ६ लाख मे. टन अतिरिक्त ऊस

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मार्चनंतर काही ऊस बळीराजा साखर कारखाना पूर्णाकडे पाठवण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. पूर्ण जिल्हाभरात ५ ते ६ लाख मे. टन ऊस अतिरिक्त आहे. अधिकच्या उसाचा प्रश्न शासनाला कळविण्यात येईल, कारण सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झाले पाहिजे, मात्र उसाचे सातत वाढत जाणारे क्षेत्र व काराखान्याची मर्यादित गाळप क्षमता, यामुळे अडचण आहे.

.............

फोटो. पान ४ शिवाजीराव जाधव