शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.जिल्ह्यातील विजेचा वापर करणा-या घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणने विभाग एक व दोन अंतर्गत वाढत्या थकबाकीच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तीन ते चार वर्षांपासून वीज देयक न भरलेल्या ४५ गावातील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण ४ कोटी २१ लाख ८८ हजार थकबाकी आहे. यामध्ये जालना ग्रामीण उपविभागातील हिरवर्डी, नसडगाव, हस्ते पिंपळगाव, अंबड उपविभागातील भांबेरी, दौडगाव, सौंदलगाव, डोमेगाव, वैणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, डोलारा, करंजळा, कुरण, डोमलगाव, धर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव, तर घनसावंगी उपविभागातील घानेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, उक्कडगाव, विरेगाव, मुधेगाव, रव्हणा, बोरंगाव तांडा, घोंन्सी तांडा, जोगलादेवी, कोठी, श्रीकृष्णनगर तांडा, गणेशनगर तांडा, शेवता या गावांचा समावेश आहे. आपला वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकधून संताप व्यक्त होत आहे.वीज बिल वसुलीच्या नावाखाली महावितरणने घनसावंगी तालुक्यातील १६ व अंबड तालुक्यातील १४ गावांचा विजपुरवठा बंद केला असल्याने बारावीच्या परिक्षेस बसलेल्या विद्यार्थांचे नुकसान होत आहे .या परिक्षेचा कालखंड संपेपर्यंत तातडीने विद्युत पुरवठा चालु करण्याच्या सूचना आ.राजेश टोपे यांनी अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांना दिल्या आहेत. घनसावंगी तालुक्यातील ७१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे विद्युत जोडणी देखील महावितरणने खंडित केल्याने त्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याही ठिकाणचा विद्युत पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. राजेश टोपे यांनी दिला आहे.