शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.जिल्ह्यातील विजेचा वापर करणा-या घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणने विभाग एक व दोन अंतर्गत वाढत्या थकबाकीच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तीन ते चार वर्षांपासून वीज देयक न भरलेल्या ४५ गावातील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण ४ कोटी २१ लाख ८८ हजार थकबाकी आहे. यामध्ये जालना ग्रामीण उपविभागातील हिरवर्डी, नसडगाव, हस्ते पिंपळगाव, अंबड उपविभागातील भांबेरी, दौडगाव, सौंदलगाव, डोमेगाव, वैणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, डोलारा, करंजळा, कुरण, डोमलगाव, धर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव, तर घनसावंगी उपविभागातील घानेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, उक्कडगाव, विरेगाव, मुधेगाव, रव्हणा, बोरंगाव तांडा, घोंन्सी तांडा, जोगलादेवी, कोठी, श्रीकृष्णनगर तांडा, गणेशनगर तांडा, शेवता या गावांचा समावेश आहे. आपला वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकधून संताप व्यक्त होत आहे.वीज बिल वसुलीच्या नावाखाली महावितरणने घनसावंगी तालुक्यातील १६ व अंबड तालुक्यातील १४ गावांचा विजपुरवठा बंद केला असल्याने बारावीच्या परिक्षेस बसलेल्या विद्यार्थांचे नुकसान होत आहे .या परिक्षेचा कालखंड संपेपर्यंत तातडीने विद्युत पुरवठा चालु करण्याच्या सूचना आ.राजेश टोपे यांनी अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांना दिल्या आहेत. घनसावंगी तालुक्यातील ७१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे विद्युत जोडणी देखील महावितरणने खंडित केल्याने त्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याही ठिकाणचा विद्युत पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. राजेश टोपे यांनी दिला आहे.