शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.जिल्ह्यातील विजेचा वापर करणा-या घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणने विभाग एक व दोन अंतर्गत वाढत्या थकबाकीच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तीन ते चार वर्षांपासून वीज देयक न भरलेल्या ४५ गावातील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण ४ कोटी २१ लाख ८८ हजार थकबाकी आहे. यामध्ये जालना ग्रामीण उपविभागातील हिरवर्डी, नसडगाव, हस्ते पिंपळगाव, अंबड उपविभागातील भांबेरी, दौडगाव, सौंदलगाव, डोमेगाव, वैणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, डोलारा, करंजळा, कुरण, डोमलगाव, धर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव, तर घनसावंगी उपविभागातील घानेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, उक्कडगाव, विरेगाव, मुधेगाव, रव्हणा, बोरंगाव तांडा, घोंन्सी तांडा, जोगलादेवी, कोठी, श्रीकृष्णनगर तांडा, गणेशनगर तांडा, शेवता या गावांचा समावेश आहे. आपला वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकधून संताप व्यक्त होत आहे.वीज बिल वसुलीच्या नावाखाली महावितरणने घनसावंगी तालुक्यातील १६ व अंबड तालुक्यातील १४ गावांचा विजपुरवठा बंद केला असल्याने बारावीच्या परिक्षेस बसलेल्या विद्यार्थांचे नुकसान होत आहे .या परिक्षेचा कालखंड संपेपर्यंत तातडीने विद्युत पुरवठा चालु करण्याच्या सूचना आ.राजेश टोपे यांनी अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांना दिल्या आहेत. घनसावंगी तालुक्यातील ७१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे विद्युत जोडणी देखील महावितरणने खंडित केल्याने त्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याही ठिकाणचा विद्युत पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. राजेश टोपे यांनी दिला आहे.