शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

वीज वितरण कंपनी आता केवळ ठेकेदारांचे घर भरण्यासाठीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:44 IST

मसूदा मांडल्यावर देशातील दहा लाख वीज कर्मचारी लगेचच संपावर जाणार असल्याची माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि देशातील भाजप सरकार हे उद्योग धार्जीणे असून, वीज वितरण कंपन्यांचे खाजगी करण हे तत्कालीन आघाडी सरकारने केल्यावर आता या सरकारने त्यावर कढी करत, सर्व कामे ही कंत्राटदारांचे खिसे भरणारीच काढली आहेत.कंत्राटदार थातूरमातूर कामे करून बिल काढून घेतो, आणि नंतर त्यांनी अर्धवट केलेले काम पुन्हा आमच्या मूळ कर्मचाऱ्यांनाच पूर्ण करावे लागत आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यातच आता २००३ च्या वीज कायद्यात बदलकरून केंद्र सरकार लोकसभेच्या आगामी हिवाळी अधिवशेनात नवीन मसूदा मांडणार आहे.मसूदा मांडल्यावर देशातील दहा लाख वीज कर्मचारी लगेचच संपावर जाणार असल्याची माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी एका हॉटेलमध्ये वर्कर्स फेडरशेनची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष सी.एन. देशमुख, कृष्णा भोयर, पी. एम. कुलकर्णी तसेच अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर कामगारांची उपस्थिती होती. या बैठकी नंतर शर्मा यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, आज देशातील उर्जा क्षेत्राची मागणी पूर्ण करताना मोठी आव्हाने आहेत. त्यातच सरकारकडे निश्चित असे कुठलेच धोरण नाही.केवळ उद्योजकांच्या तुंबड्या भरण्यासाठी बीएसएनएल प्रमाणे वीज वितरणची अवस्था केली आहे. भविष्यात त्यात आणखी चुकीचे निर्णय घेतले जाणार आहेत. वीज कायदा २००३ मध्ये देखील अनेक कल्याणकारी तरतुदींना फाटा देण्यात येणार असून, हे बिल नव्याने सादर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्या विरोधात आमची संघटना देशभर रान उठवणार आहे.दरम्यान वर्कर्स फेडरेशनच्या स्थापनेस यंदा शंभरवर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त मुंबईत देशव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, देशातून दहा लाख कामगार त्यावेळी येणार असल्याचे शर्मा म्हणाले यावेळी सी.एन. देशमुख, भोयर, कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजCentral Governmentकेंद्र सरकार