शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वीज वितरण कंपनी आता केवळ ठेकेदारांचे घर भरण्यासाठीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:44 IST

मसूदा मांडल्यावर देशातील दहा लाख वीज कर्मचारी लगेचच संपावर जाणार असल्याची माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि देशातील भाजप सरकार हे उद्योग धार्जीणे असून, वीज वितरण कंपन्यांचे खाजगी करण हे तत्कालीन आघाडी सरकारने केल्यावर आता या सरकारने त्यावर कढी करत, सर्व कामे ही कंत्राटदारांचे खिसे भरणारीच काढली आहेत.कंत्राटदार थातूरमातूर कामे करून बिल काढून घेतो, आणि नंतर त्यांनी अर्धवट केलेले काम पुन्हा आमच्या मूळ कर्मचाऱ्यांनाच पूर्ण करावे लागत आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यातच आता २००३ च्या वीज कायद्यात बदलकरून केंद्र सरकार लोकसभेच्या आगामी हिवाळी अधिवशेनात नवीन मसूदा मांडणार आहे.मसूदा मांडल्यावर देशातील दहा लाख वीज कर्मचारी लगेचच संपावर जाणार असल्याची माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी एका हॉटेलमध्ये वर्कर्स फेडरशेनची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष सी.एन. देशमुख, कृष्णा भोयर, पी. एम. कुलकर्णी तसेच अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर कामगारांची उपस्थिती होती. या बैठकी नंतर शर्मा यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, आज देशातील उर्जा क्षेत्राची मागणी पूर्ण करताना मोठी आव्हाने आहेत. त्यातच सरकारकडे निश्चित असे कुठलेच धोरण नाही.केवळ उद्योजकांच्या तुंबड्या भरण्यासाठी बीएसएनएल प्रमाणे वीज वितरणची अवस्था केली आहे. भविष्यात त्यात आणखी चुकीचे निर्णय घेतले जाणार आहेत. वीज कायदा २००३ मध्ये देखील अनेक कल्याणकारी तरतुदींना फाटा देण्यात येणार असून, हे बिल नव्याने सादर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्या विरोधात आमची संघटना देशभर रान उठवणार आहे.दरम्यान वर्कर्स फेडरेशनच्या स्थापनेस यंदा शंभरवर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त मुंबईत देशव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, देशातून दहा लाख कामगार त्यावेळी येणार असल्याचे शर्मा म्हणाले यावेळी सी.एन. देशमुख, भोयर, कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजCentral Governmentकेंद्र सरकार