शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

पालिकेभोवती फिरतेय जालन्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:54 IST

येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. परंतु सर्व राजकारण फिरतेय ते जालना पालिकेभोवती.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जालना विधानसभा मतदारसंघात शंभरपेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. परंतु सर्व राजकारण फिरतेय ते जालना पालिकेभोवती. ही पालिका काँग्रेसच्या ताब्यात असून, जनतेतून नगराध्यक्ष निवडतांना देखील काँग्रेसच्या संगीता गोरंट्याल या राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप यांच्यातील कुरघोडीचे राजकारण त्याचे किस्से आजही तेवढेच ताज्या पध्दतीने चर्चिले जातात.जालना पालिका ही बहुतांश काळ ही शिवसेना, भाजपच्या ताब्यात होती. तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांचा २००१ ते २००६ हा जनतेतून निवडून आल्यावरच्या काळात त्यांनी कल्पकतेने काही विकास कामे केली. त्याचेच गुणगान शिवसेनकडून आजही केले जात आहे. पालिकेच्या निवडणुकीत देखील महाविद्यालयीन मित्र असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल आणि माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांचाच वरचष्मा असतो. कधी पारडे काँग्रेसकडे तर कधी ते युतीकडे झुकते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शहरातून १२ नगरसेवक निवडून आणून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर ते मागे पडले.आज जालना पालिका चर्चेत आली आहे, ती आयुक्तांच्या चौकशीवरून आणि अंदाज समितीने केलेल्या चौकशी अहवालात ओढलेल्या ताशेऱ्यांवरून अंदाज समितीने ते ताशेरे ओढले आहेत, त्या बद्दल आता आम्हाला सांभाळून घ्यावे अशी विनंती पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली. विशेष म्हणजे पालिकेत गेल्या कित्येक वर्षापासून अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे भरलेली नाहीत. त्याातच राजकीय हस्तक्षेप पदोपदी असल्याने आम्ही काम कसे करावे असा सवाल अधिकारी, कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही.दरम्यान, जालना पालिकेतील गेल्या दहा वर्षातील चौकशी सुरू असली तरी काँग्रेसकडून शिवसेना-भाजपच्या ताब्यात पालिका असतानाच्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्याने आता केल्याने यात आणखी व्टिस्ट आला आहे. त्याच पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. परंतु तो अद्याप जिल्हाधिकाºयांकडून मंजूर झालेला नाही. राऊत यांनी जो राजीनामा देऊ केला आहे, तो त्यांनी नगराध्यक्षांकडे द्यावा, असे निकष असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी तसे केले नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच त्यांना पालिकेतील कामकाजाची खडान्खडा माहिती असल्याने त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अंतर्गत जलवाहीनीसह कर आकारणीच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे. आणि त्यातील अंतर्गत जलवाहिनीची चौकशी कररून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्याधिकाºयांना दिले आहेत.पुन्हा खोतकर - गोरंट्याल लढत रंगणारजालना विधानसभेच्या दृष्टीने राजमंत्री अर्जुन खोतकर यांनी आता पालिकेच्या कामकाजात उडी घेतली आहे. या चौकशीच्या भुंग्याने सध्या ते चांगलेच चर्चेत आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरंट्याल यांचे राजकारणच मुळात पालिकेतून सुरू झाले.नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नंतर आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यामुळे शहराची नस अन् नस त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे अशा चौकांश्या त्यांच्यासाठी नवीन नाहीत. मध्यंतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे विधानसभे ऐवजी विधान परिषदेतून निवडणूक लढतील अशा अटकली लावल्या जात होत्या.परंतु ही वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातच लढत जवळपास निश्चित मानली जात आहे. माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांना आता गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद दिल्याने ते आपोआच या शर्यतीतून दूर झाल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण