शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे प्रवेश सोहळे अन् शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:25 IST

भाजपचे पक्षप्रवेश सोहळे, शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे, काँग्रेसची संविधान बचाव रॅली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही दिवसांपासून भाजप पक्ष जालना शहरासह जिल्ह्यात आक्रमक झाला असून, नेत्यांनी पक्षप्रवेश सोहळे करून वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. तर शिवसेनेनेही जिल्ह्यात सदस्य नोंदणीच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळावे घेत कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे पक्षप्रवेश सोहळे, शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे, काँग्रेसची संविधान बचाव रॅली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत वातावरण तापविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सत्ताधारी भाजपने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनाच मैदानात उतरवून इतर पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपत प्रवेश देण्याचा सपाटा सुरु केला आहे. जालना शहरात गत एक महिन्यात सात ते आठ पक्षप्रवेश सोहळे पार पडले आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्त्वाने इतर पक्षांतील नाराजांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, जि. प. सदस्य राहुल लोणीकर, सुनील आर्दड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सक्रिय झाले असून, आगामी निवडणुकीची व्यूहरचना आखली जात आहे. शहरातील या सोहळ्यांमुळे शहरात भाजपची ताकद वाढत असली तरी इतर पक्षांनीही राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेने जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान राबविले. तसेच कार्यकर्ता मेळावे घेऊन पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत स्फुल्लिंग चेतविण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, डॉ. हिकमत उढाण, माजी आ. शिवाजी चोथे, माजी आ. संतोष सांबरे, लक्ष्मण वडले, रमेश गव्हाड आदींनी जिल्हा पिंजून काढला आहे. कडवे शिवसैनिकच पक्षाला जिल्ह्यात संजीवनी देऊ शकतात, ही बाब पक्ष धुरिणांनी हेरुन सदस्य नोंदणीतून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात राजकीय शक्ती वाढविण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून केला जात असला तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरले असून, कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर हल्लाबोल मोर्चा काढून नाकर्त्या सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, बबलू चौधरी, कपिल आकात आदी प्रमुख नेत्यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंठा, घनसावंगी, बदनापूर आणि जाफराबाद येथे काढलेल्या हल्लाबोल मोर्चास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या मोर्चात राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते सहभागी झाल्याने पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत चैतन्य पसरले आहे. तर काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीने सत्ताधाºयांची झोप उडविली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, अब्दुल हाफीज, राजाभाऊ देशमुख, बाबूराव कुलकर्णी, विमल आगलावे, विजय कामड, प्रा. सत्संग मुंडे, ज्ञानदेव पायगव्हाणे, अंकुशराव राऊत, दिनकर घेवंदे, राम सावंत, राजेंद्र राख, राजेश काळे, नीळकंठ वायाळ, शेख महेमूद आदींनी सक्रिय भूमिका घेतल्याने पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून हे पक्ष आक्रमक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याचे संकेत मिळत आहेत. याची तयारी आतापासूनच सुरु झाली असून, आपापली राजकीय ताकद वाढविण्याच्या दिशेने सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. पक्षप्रवेश सोहळे, कार्यकर्ता मेळावे, मोर्चा व रॅलीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, यातून कोणत्या पक्षाचा जनाधार वाढतो आणि याचे रुपांतर मतदानात किती प्रमाणात होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.