शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे प्रवेश सोहळे अन् शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:25 IST

भाजपचे पक्षप्रवेश सोहळे, शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे, काँग्रेसची संविधान बचाव रॅली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही दिवसांपासून भाजप पक्ष जालना शहरासह जिल्ह्यात आक्रमक झाला असून, नेत्यांनी पक्षप्रवेश सोहळे करून वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. तर शिवसेनेनेही जिल्ह्यात सदस्य नोंदणीच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळावे घेत कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे पक्षप्रवेश सोहळे, शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे, काँग्रेसची संविधान बचाव रॅली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत वातावरण तापविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सत्ताधारी भाजपने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनाच मैदानात उतरवून इतर पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपत प्रवेश देण्याचा सपाटा सुरु केला आहे. जालना शहरात गत एक महिन्यात सात ते आठ पक्षप्रवेश सोहळे पार पडले आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्त्वाने इतर पक्षांतील नाराजांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, जि. प. सदस्य राहुल लोणीकर, सुनील आर्दड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सक्रिय झाले असून, आगामी निवडणुकीची व्यूहरचना आखली जात आहे. शहरातील या सोहळ्यांमुळे शहरात भाजपची ताकद वाढत असली तरी इतर पक्षांनीही राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेने जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान राबविले. तसेच कार्यकर्ता मेळावे घेऊन पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत स्फुल्लिंग चेतविण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, डॉ. हिकमत उढाण, माजी आ. शिवाजी चोथे, माजी आ. संतोष सांबरे, लक्ष्मण वडले, रमेश गव्हाड आदींनी जिल्हा पिंजून काढला आहे. कडवे शिवसैनिकच पक्षाला जिल्ह्यात संजीवनी देऊ शकतात, ही बाब पक्ष धुरिणांनी हेरुन सदस्य नोंदणीतून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात राजकीय शक्ती वाढविण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून केला जात असला तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरले असून, कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर हल्लाबोल मोर्चा काढून नाकर्त्या सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, बबलू चौधरी, कपिल आकात आदी प्रमुख नेत्यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंठा, घनसावंगी, बदनापूर आणि जाफराबाद येथे काढलेल्या हल्लाबोल मोर्चास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या मोर्चात राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते सहभागी झाल्याने पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत चैतन्य पसरले आहे. तर काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीने सत्ताधाºयांची झोप उडविली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, अब्दुल हाफीज, राजाभाऊ देशमुख, बाबूराव कुलकर्णी, विमल आगलावे, विजय कामड, प्रा. सत्संग मुंडे, ज्ञानदेव पायगव्हाणे, अंकुशराव राऊत, दिनकर घेवंदे, राम सावंत, राजेंद्र राख, राजेश काळे, नीळकंठ वायाळ, शेख महेमूद आदींनी सक्रिय भूमिका घेतल्याने पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून हे पक्ष आक्रमक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याचे संकेत मिळत आहेत. याची तयारी आतापासूनच सुरु झाली असून, आपापली राजकीय ताकद वाढविण्याच्या दिशेने सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. पक्षप्रवेश सोहळे, कार्यकर्ता मेळावे, मोर्चा व रॅलीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, यातून कोणत्या पक्षाचा जनाधार वाढतो आणि याचे रुपांतर मतदानात किती प्रमाणात होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.