वाहतुकीची कोंडी
जालना : शहरातील काद्राबाद रोडवर वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार वाढला आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघात होत असून, पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी वाहतूक शाखेने याकडे लक्ष देऊन वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
अंबड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. अनेक वाहनांमध्ये तोडलेल्या लाकडांची वाहतूक होताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
हरिनाम सप्ताहास प्रारंभ
परतूर : तालुक्यातील दैठणा खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत हा सप्ताह चालणार असून, यानिमित्त विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होत असून, धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
उजेड यांचा गौरव
जालना : येथील अभिनेते गजानन उजेड यांना औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात लोकनिर्माण ग्रामीण विकास संशोधन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.