शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरातील पोलीस चौक्या कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:29 IST

लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विविध भागांमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहे. परंतु लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील नागरिकांना काही तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाणे दूर पडते. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यांतर्गत शहरात सात चौक्या उभारण्यात आल्या. यात बडीसडक, काद्राबाद, मंमादेवी, बाजार पोलीस चौकी, नूतन वसाहत, जवाहर नगर, भोकरदन नाका या ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या. परंतु, चौक्यांमध्ये पोलीस कर्मचारी थांबत नसल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.बडीसडक येथील पोलीस चौकीची पाहणी केली असता, तेथील चौकीला कुलूप दिसले. नागरिकांना विचारले असता, या चौकीत पोलीस थांबत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तेथूनच जवळ असलेली काद्राबाद पोलीस चौकीही बंद दिसली. चौकीची इमारत सुज्ज आहे. परंतु येथे कोणीच दिसले नाही.मात्र, मंमादेवी चौकातील पोलीस चौकीत कर्मचारी दिसले. नूतन वसाहत परिसरातील पोलीस चौकीची तर दुरवस्था पाहायला मिळाली. चौकीसमोरच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत.चौकीला दरवाज्या नसल्याने चॅनल गेटला कुलूप दिसले. शहरातील सर्वच चौक्यांवर लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, एकाही चौकीत कर्मचारी नसल्याने चौक्या फक्त शोभेची ठिकाणे बनल्या आहेत.याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.घाणीचे साम्राज्यचौक्यांची पाहणी केली असता, बडी सडक, काद्राबाद या चौक्यांचा परिसर स्वच्छ दिसला. परंतु मंमादेवी चौकी, नूतन वसाहत येथील चौकी समोरच घाणीचे साम्राज्य दिसले. या चौकीच्या भिंतीही पडलेल्या आहे. तसेच खिड्यांची काचे, कचऱ्याचे ढीगही येथे आढळून आले.बाजार चौकातील पोलीस चौकी तर नेहमीच बंद राहत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरात नेहमीच गर्दी असते. येथे पोलीस कर्मचारी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरजलाखो रुपये खर्च करुन शहरातील विविध भागांमध्ये चौक्या तयार करण्यात आल्या. परंतु, याकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष असते. याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना