शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरातील पोलीस चौक्या कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:29 IST

लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विविध भागांमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहे. परंतु लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील नागरिकांना काही तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाणे दूर पडते. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यांतर्गत शहरात सात चौक्या उभारण्यात आल्या. यात बडीसडक, काद्राबाद, मंमादेवी, बाजार पोलीस चौकी, नूतन वसाहत, जवाहर नगर, भोकरदन नाका या ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या. परंतु, चौक्यांमध्ये पोलीस कर्मचारी थांबत नसल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.बडीसडक येथील पोलीस चौकीची पाहणी केली असता, तेथील चौकीला कुलूप दिसले. नागरिकांना विचारले असता, या चौकीत पोलीस थांबत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तेथूनच जवळ असलेली काद्राबाद पोलीस चौकीही बंद दिसली. चौकीची इमारत सुज्ज आहे. परंतु येथे कोणीच दिसले नाही.मात्र, मंमादेवी चौकातील पोलीस चौकीत कर्मचारी दिसले. नूतन वसाहत परिसरातील पोलीस चौकीची तर दुरवस्था पाहायला मिळाली. चौकीसमोरच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत.चौकीला दरवाज्या नसल्याने चॅनल गेटला कुलूप दिसले. शहरातील सर्वच चौक्यांवर लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, एकाही चौकीत कर्मचारी नसल्याने चौक्या फक्त शोभेची ठिकाणे बनल्या आहेत.याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.घाणीचे साम्राज्यचौक्यांची पाहणी केली असता, बडी सडक, काद्राबाद या चौक्यांचा परिसर स्वच्छ दिसला. परंतु मंमादेवी चौकी, नूतन वसाहत येथील चौकी समोरच घाणीचे साम्राज्य दिसले. या चौकीच्या भिंतीही पडलेल्या आहे. तसेच खिड्यांची काचे, कचऱ्याचे ढीगही येथे आढळून आले.बाजार चौकातील पोलीस चौकी तर नेहमीच बंद राहत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरात नेहमीच गर्दी असते. येथे पोलीस कर्मचारी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरजलाखो रुपये खर्च करुन शहरातील विविध भागांमध्ये चौक्या तयार करण्यात आल्या. परंतु, याकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष असते. याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना