शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जालना शहरातील पोलीस चौक्या कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:29 IST

लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विविध भागांमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहे. परंतु लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील नागरिकांना काही तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाणे दूर पडते. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यांतर्गत शहरात सात चौक्या उभारण्यात आल्या. यात बडीसडक, काद्राबाद, मंमादेवी, बाजार पोलीस चौकी, नूतन वसाहत, जवाहर नगर, भोकरदन नाका या ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या. परंतु, चौक्यांमध्ये पोलीस कर्मचारी थांबत नसल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.बडीसडक येथील पोलीस चौकीची पाहणी केली असता, तेथील चौकीला कुलूप दिसले. नागरिकांना विचारले असता, या चौकीत पोलीस थांबत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तेथूनच जवळ असलेली काद्राबाद पोलीस चौकीही बंद दिसली. चौकीची इमारत सुज्ज आहे. परंतु येथे कोणीच दिसले नाही.मात्र, मंमादेवी चौकातील पोलीस चौकीत कर्मचारी दिसले. नूतन वसाहत परिसरातील पोलीस चौकीची तर दुरवस्था पाहायला मिळाली. चौकीसमोरच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत.चौकीला दरवाज्या नसल्याने चॅनल गेटला कुलूप दिसले. शहरातील सर्वच चौक्यांवर लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, एकाही चौकीत कर्मचारी नसल्याने चौक्या फक्त शोभेची ठिकाणे बनल्या आहेत.याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.घाणीचे साम्राज्यचौक्यांची पाहणी केली असता, बडी सडक, काद्राबाद या चौक्यांचा परिसर स्वच्छ दिसला. परंतु मंमादेवी चौकी, नूतन वसाहत येथील चौकी समोरच घाणीचे साम्राज्य दिसले. या चौकीच्या भिंतीही पडलेल्या आहे. तसेच खिड्यांची काचे, कचऱ्याचे ढीगही येथे आढळून आले.बाजार चौकातील पोलीस चौकी तर नेहमीच बंद राहत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरात नेहमीच गर्दी असते. येथे पोलीस कर्मचारी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरजलाखो रुपये खर्च करुन शहरातील विविध भागांमध्ये चौक्या तयार करण्यात आल्या. परंतु, याकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष असते. याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना