शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

लूट प्रकरणातील पाच जणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:43 IST

मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून सेल्समनचे पावनेदोन लाख रुपये लुटणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना : मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून सेल्समनचे पावनेदोन लाख रुपये लुटणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुजरात येथील सेल्समन जतीन मन्सूखभाई ठक्कर हे बुधवारी जालना येथील जिंदल मार्केट येथील एका कटलरी दुकानात वसुलीसाठी आले होते. त्याच कटलरी दुकानातील ओळखीच्या नोकर बाळू अप्पा लंगोटे याला सोबत घेऊन रात्री दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद निघाले होते. जालना औरंगाबाद मार्गावर असलेल्या एकता हॉटेल परिसरात आल्यानंतर बाळू लंगोटे याने लघवी करण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबविताच पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी अचानक हल्ला करुन ठक्कर यांना लाकडी काठीने मारहाण केली. तसेच डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख १ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पसार झाले होते. वर्दळीच्या जालना - औरंगाबाद महामार्गावर लुटीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. जतीन ठक्कर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोनि. राजेंद्रसिंग गौर यांना माहिती कळताच त्यांनी तपासाची चके्र फिरवून बाळू रामआप्पा लंगोटे, (२४), सुशांत राजू भुरे (२०), रवी आनंद कुस्लमवार (२५), लक्ष्मण किसन गोरे (२२) अमोल एकनाथ काचेवाड (२२) यांना ताब्यात घेतले.पकडलेले आरोपी सराईतपकडेलेल्या पाच आरोपीपैकी दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे लुटीच्या घटनेत या टोळीचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. टोळीकडून जिल्ह्यासह इतर कोठे अशा प्रकारे लुटमार केली आहे याचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी